भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही येत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गाजत असताना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे नुकतीच एक घटना घडली आहे. येथील २१ वर्षीय विद्यार्थीनीच्या भटक्या कुत्र्यांनी गालाचा चावा घेतला आहे. बीबीएच्या कोर्सला शिकणारी विद्यार्थीनी महाविद्यालयातून घरी येत असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.


या हल्ल्यात सदर विद्यार्थी गंभीर जखमी झाली असून डॉक्टरांनी तिच्या गालावर १७ टाके घातले आहेत. ही घटना २० ऑगस्ट रोजी कानपूरच्या शान नगर परिसरात घडली. या परिसरात भटके कुत्रे आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू होता. या दरम्यान तिथून जात असलेल्या वैष्णवी साहू नाम विद्यार्थीनीवर अचानक तीन कुत्र्यांनी हल्ला केला.


भटक्या कुत्र्यांनी वैष्णवीवर इतक्या जोरात जबर हल्ला केला की, ती जमिनीवर पडली. त्यानंतर कुत्र्यांनी तिचा चेहरा विद्रूप केला. तिचा उजवा गाल अशरक्षः फाटला. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले. तिने कुत्र्यांच्या तावडीतून निसटून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांनी तिचा पाठलाग करून पुन्हा हल्ला केला.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या