भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही येत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गाजत असताना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे नुकतीच एक घटना घडली आहे. येथील २१ वर्षीय विद्यार्थीनीच्या भटक्या कुत्र्यांनी गालाचा चावा घेतला आहे. बीबीएच्या कोर्सला शिकणारी विद्यार्थीनी महाविद्यालयातून घरी येत असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.


या हल्ल्यात सदर विद्यार्थी गंभीर जखमी झाली असून डॉक्टरांनी तिच्या गालावर १७ टाके घातले आहेत. ही घटना २० ऑगस्ट रोजी कानपूरच्या शान नगर परिसरात घडली. या परिसरात भटके कुत्रे आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू होता. या दरम्यान तिथून जात असलेल्या वैष्णवी साहू नाम विद्यार्थीनीवर अचानक तीन कुत्र्यांनी हल्ला केला.


भटक्या कुत्र्यांनी वैष्णवीवर इतक्या जोरात जबर हल्ला केला की, ती जमिनीवर पडली. त्यानंतर कुत्र्यांनी तिचा चेहरा विद्रूप केला. तिचा उजवा गाल अशरक्षः फाटला. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले. तिने कुत्र्यांच्या तावडीतून निसटून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांनी तिचा पाठलाग करून पुन्हा हल्ला केला.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम