भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही येत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गाजत असताना उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे नुकतीच एक घटना घडली आहे. येथील २१ वर्षीय विद्यार्थीनीच्या भटक्या कुत्र्यांनी गालाचा चावा घेतला आहे. बीबीएच्या कोर्सला शिकणारी विद्यार्थीनी महाविद्यालयातून घरी येत असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.


या हल्ल्यात सदर विद्यार्थी गंभीर जखमी झाली असून डॉक्टरांनी तिच्या गालावर १७ टाके घातले आहेत. ही घटना २० ऑगस्ट रोजी कानपूरच्या शान नगर परिसरात घडली. या परिसरात भटके कुत्रे आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू होता. या दरम्यान तिथून जात असलेल्या वैष्णवी साहू नाम विद्यार्थीनीवर अचानक तीन कुत्र्यांनी हल्ला केला.


भटक्या कुत्र्यांनी वैष्णवीवर इतक्या जोरात जबर हल्ला केला की, ती जमिनीवर पडली. त्यानंतर कुत्र्यांनी तिचा चेहरा विद्रूप केला. तिचा उजवा गाल अशरक्षः फाटला. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्यांनी चावे घेतले. तिने कुत्र्यांच्या तावडीतून निसटून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांनी तिचा पाठलाग करून पुन्हा हल्ला केला.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या