बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय घसरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. ज्याचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाच्या हाती लागला. शंतनू अविनाश मानकर (२५) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,


मूर्तिजापूर येथील माना पोलीस ठाण्यांतर्गत खोळद गावाजवळ पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी शंतनू पहाटेच्या दरम्यान पेढी नदीवर गेला होता. तेव्हा हा दुर्दैवी अपघात घडला.  या घटनेनंतर मुर्तीजापुर तहसीलदारांच्या सूचनेवरून शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधकार्याला तात्काळ सुरुवात करण्यात आली. मात्र नदीचा प्रवाह अधिक असल्यामुळे संबंधित युवकाचा शोध त्वरित लागू शकला नाही. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी बोटीच्या सहाय्याने शंतनूचा शोध घेणे चालू ठेवले होते. अखेरीस आज दुपारी १२  वा, दरम्यान बचाव पथकाच्या सदस्यांना शंतनूचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.


शंतनूचा मृतदेह बाहेर काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 
Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी