बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय घसरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. ज्याचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाच्या हाती लागला. शंतनू अविनाश मानकर (२५) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,


मूर्तिजापूर येथील माना पोलीस ठाण्यांतर्गत खोळद गावाजवळ पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी शंतनू पहाटेच्या दरम्यान पेढी नदीवर गेला होता. तेव्हा हा दुर्दैवी अपघात घडला.  या घटनेनंतर मुर्तीजापुर तहसीलदारांच्या सूचनेवरून शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधकार्याला तात्काळ सुरुवात करण्यात आली. मात्र नदीचा प्रवाह अधिक असल्यामुळे संबंधित युवकाचा शोध त्वरित लागू शकला नाही. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी बोटीच्या सहाय्याने शंतनूचा शोध घेणे चालू ठेवले होते. अखेरीस आज दुपारी १२  वा, दरम्यान बचाव पथकाच्या सदस्यांना शंतनूचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.


शंतनूचा मृतदेह बाहेर काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 
Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य