बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय घसरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. ज्याचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाच्या हाती लागला. शंतनू अविनाश मानकर (२५) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,


मूर्तिजापूर येथील माना पोलीस ठाण्यांतर्गत खोळद गावाजवळ पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी शंतनू पहाटेच्या दरम्यान पेढी नदीवर गेला होता. तेव्हा हा दुर्दैवी अपघात घडला.  या घटनेनंतर मुर्तीजापुर तहसीलदारांच्या सूचनेवरून शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधकार्याला तात्काळ सुरुवात करण्यात आली. मात्र नदीचा प्रवाह अधिक असल्यामुळे संबंधित युवकाचा शोध त्वरित लागू शकला नाही. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी बोटीच्या सहाय्याने शंतनूचा शोध घेणे चालू ठेवले होते. अखेरीस आज दुपारी १२  वा, दरम्यान बचाव पथकाच्या सदस्यांना शंतनूचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.


शंतनूचा मृतदेह बाहेर काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 
Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला