मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत येणार, नाशिक, जालनामध्ये बैठकांचं सत्र

  36

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघणार काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईत येणार असून मराठा समाजाच्या नागरिकांना लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. पण मुंबई येत्या 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांची मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत.


विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील तयारी आणि बैठका विविध ठिकाणी सुरु आहेत. तर दुसरीकडॆ मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलन सुरु होण्यापूर्वीच राज्य सरकार सक्रीय झाल्याचं बघायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरती तब्बल दीड ते दोन तास खलबते चालल्याची माहिती समोर आली .


दुसरीकडे, मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार आहे.


मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आधी राज्य सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे संभाव्य परिस्थिती लक्ष्यात घेता या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आलाय.

Comments
Add Comment

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

Hinjawadi Accident : बेदरकार मिक्सरने घेतला निष्पाप जीव! हिंजवडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; चालकासह मालकावरही दाखल केला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या पाहता हिंजवडी पोलिसांनी आता

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, ईडीनंतर अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती

अकोटमध्ये गाढवांचा अनोखा पोळा

अकोला: अकोट शहरात आज गाढवांचा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना,