'गणेशोत्सवात किती पडणार पाऊस ? पावसाविषयी हवामान खात्याचा नवा अंदाज जाहीर


मुंबई : गणेशोत्सवात किती पाऊस पडणार ? या अनेकांना सतावत असलेल्या प्रश्नाचे उत्तर हवामान खात्याने दिले आहे. हवामान खात्याने ४ सप्टेंबर २०२५ पर्यंतचा राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील पावसाबाबतचा नवा अंदाज जाहीर झाला केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गणेशोत्सवादरम्यान कोकण विभागात पावसाची शक्यता आहे.


उत्तर कोकण म्हणजे, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्टपर्यंत सरासरी २० ते ४० मिलीमीटर पाऊस दररोज पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये २८ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण थोडे कमी असेल. त्यानंतर २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण कोकण विभागात दररोज सरासरी २० ते ४० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.


प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी येथे रविवार २४ ऑगस्ट ते मंगळवार २६ ऑगस्ट या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये २६ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर पालघर जिल्ह्यात २६ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. धुळे आणि जळगाव येथे नंदुरबार येथे २४ ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. २५ ऑगस्टला धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीनही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकेल. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात २६ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.


नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई ठाणे पालघरसह विदर्भ, खान्देशातील जिल्ह्यात २६ ते २८ ऑगस्टदरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. रविवार, २४ ऑगस्ट रोजी 'मॅडन ज्युलिअन ऑस्सिलेशन' या घटकाच्या प्रवेशामुळे बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाब क्षेत्र निर्माण होऊन त्याचा वायव्य दिशेकडे प्रवास होईल. यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांबरोबरच विदर्भ खान्देशांतील नद्यांच्या पात्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते

उत्तर पश्चिम जिल्ह्यात महायुतीचे ३२ ते ३३ नगरसेवक निवडून आणणार

भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड ज्ञानमूर्ती शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (सचिन धानजी) : उत्तर पश्चिम लोकसभा

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट होत आहे अपग्रेड

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा सोळावा

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील

शीतल म्हात्रे यांचा मोठा निर्णय : महापालिका निवडणूक लढवणार नाही, आमदारकीवर लक्ष केंद्रित!

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.