'गणेशोत्सवात किती पडणार पाऊस ? पावसाविषयी हवामान खात्याचा नवा अंदाज जाहीर


मुंबई : गणेशोत्सवात किती पाऊस पडणार ? या अनेकांना सतावत असलेल्या प्रश्नाचे उत्तर हवामान खात्याने दिले आहे. हवामान खात्याने ४ सप्टेंबर २०२५ पर्यंतचा राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील पावसाबाबतचा नवा अंदाज जाहीर झाला केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गणेशोत्सवादरम्यान कोकण विभागात पावसाची शक्यता आहे.


उत्तर कोकण म्हणजे, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्टपर्यंत सरासरी २० ते ४० मिलीमीटर पाऊस दररोज पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये २८ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण थोडे कमी असेल. त्यानंतर २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण कोकण विभागात दररोज सरासरी २० ते ४० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.


प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी येथे रविवार २४ ऑगस्ट ते मंगळवार २६ ऑगस्ट या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये २६ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर पालघर जिल्ह्यात २६ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. धुळे आणि जळगाव येथे नंदुरबार येथे २४ ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. २५ ऑगस्टला धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीनही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकेल. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात २६ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.


नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई ठाणे पालघरसह विदर्भ, खान्देशातील जिल्ह्यात २६ ते २८ ऑगस्टदरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. रविवार, २४ ऑगस्ट रोजी 'मॅडन ज्युलिअन ऑस्सिलेशन' या घटकाच्या प्रवेशामुळे बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाब क्षेत्र निर्माण होऊन त्याचा वायव्य दिशेकडे प्रवास होईल. यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांबरोबरच विदर्भ खान्देशांतील नद्यांच्या पात्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास