जीएसटी काऊन्सिलची ३ आणि ४ सप्टेंबरला बैठक होणार

प्रतिनिधी:जीएसटी संरचनेत बदल होण्याची चर्चा वेगाने पुढे जात आहे. त्यातील नवी घडामोड म्हणजे जीएसटी काऊन्सिलची बैठक ३ ते ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात जीएसटी २.० घोषणा केली होती. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष कर म्हणजेच जीएसटीत मोठ्या प्रमाणात कपात होण्याचे संकेत दिले ज्याला आता मंत्रीमंडळाच्या समुहाने मोहोर देखील लावली. याच धर्तीवर आता जीएसटी काऊन्सिल बैठकीत प्रस्तावित दोन स्लॅब्स विषयी विस्तृत चर्चा अपेक्षित आहे.


केंद्राने मंत्रीगटांना प्रस्तावित केलेल्या सुधारणांनुसार, वस्तू आणि सेवा कर (GST) हा ५ आणि १८ टक्के अशा दोन-दरांचा असावा,ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचे 'गुणवत्ता' आणि 'मानक' असे वर्गीकरण केले जाईल. अल्ट्रा-लक्झरी कार आणि बिनधास्त वस्तूंसारख्या काही निवडक वस्तूंवर ४० टक्के विशेष दर आकारला जाईल असे सांगितले गेले होते. दरम्यान मंत्रीमंडळाच्या बैठकीत दोन्ही स्लॅब्सला मान्यता दिली गेली असली तरी १२% स्लॅब्स अंतर्भूत करावा अशी सूचना सरकारला केली आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारा मन भविष्यात निर्णय घेतील. सध्या चार स्तरीय स्लॅब्स असलेला जीएसटी अस्तित्वात आहे. ५,१२,१८,२८ असे चार टप्पे जीएसटीत अंतर्भूत आहेत.


तथापि, सांगितलेल्या माहितीनुसार, जीएसटी कौन्सिलने या प्रस्तावांना मोठ्या चर्चेशिवाय मान्यता देण्याची अपेक्षा नाही. गुरुवारी २१ ऑगस्टला केरळचे अर्थमंत्री व मंत्रिमंडळाचे सदस्य के.एन. बालगोपाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की, केंद्राच्या दर क पातीच्या प्रस्तावांमुळे राज्यांना होणाऱ्या महसुली परिणामांबद्दल चिंता आहे. त्यांनी पुढे म्हटले की, मंत्रिगटाने जीएसटी कौन्सिलला असे सुचवले आहे की, जर या दर सुसूत्रीकरणामुळे राज्यांना कोणतेही नुकसान झाले तर त्यांची भरपाई करण्यासाठी एक यंत्रणा अ सावी. जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीनंतर आठ महिन्यांहून अधिक काळानंतर होणार आहे. नियमांनुसार, परिषद दर तिमाहीत किमान एकदा बैठक घेते. केंद्राच्या दर कपातीच्या प्रस्तावांमुळे राज्यांना होणाऱ्या महसुली परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या विधानावर भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

शरद पवार राज्यसभेसाठी पुन्हा रिंगणात?

मविआ'चे अस्तित्व लागणार पणाला; सातपैकी सहा जागांवर महायुतीचे वर्चस्व शक्य मुंबई (सुहास शेलार) : राज्यातील

काँग्रेसकडून शिवछत्रपतींची तुलना क्रूरकर्मा टिपू सुलतानाशी- प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे अकलेचे तारे; हजारो मंदिरांचा विध्वंस करणाऱ्या टिपू सुलतानाला ठरवले शिवरायांच्या समकक्ष

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शौर्याचा आणि त्यांनी निर्माण

चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे जर-तरवर चर्चा करण्यात अर्थ नाही; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

मुंबई : विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी

शशिकांत शिंदेचा जाहीर निषेध; शशिकांत शिंदेनी दादांच्या कुटुंबाची माफी मागावी - आनंद परांजपे

अजितदादा काय कारणाने पक्षातून बाहेर पडले याची अत्यंत खोटी,चुकीची,दिशाभूल करणारी माहिती त्या