भररस्त्यात हातात चाकू घेऊन मास्क मॅनची दहशत ! नागरिक भयभीत

  33

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या समस्या वाढत आहेत . एकामागोमाग एक अशा गुन्हेगारी घटना पुण्यात घडत असतात . त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय . पुण्यात दिवसाढवळ्या एक इसम हातात चाकू घेऊन आणि मास्क घालून फिरत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे . निगडीतील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


हातात चाकू घेत हा इसम गर्दीच्या ठिकाणी फिरत होता. त्याच्या तोंडावर मास्क लावलेला होता. रस्त्यावर चाकू घेऊन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती . या मास्क मॅनची माहिती मिळताच अगदी काही तासांच्या आत निगडी पोलिसांनी या मास्क मॅनला ताब्यात घेतले. हातात धारदार चाकू घेऊन फिरणारा मास्क मॅन हा मनोरुग्ण असून भंगार वेचक असल्याचे म्हटले जात आहे.


या व्यक्तीशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात तो विचित्र कपड्यांमध्ये दिसत आहे. या व्यक्तीचा हेतू नक्की काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा व्यक्ती कोणावर हल्ला करण्याच्या उद्देशाने फिरत होता का ? याचा तपास पोलिस करत आहे .

Comments
Add Comment

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला हिरवा कंदील

राज्य सरकारच्या पायाभूत समितीची मंजुरी पुणे : बहुप्रतिक्षित पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या

विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केले शालेय प्रगतीपुस्तक, गुण पाहून व्हाल अचंबित

मुंबई: विश्वास नांगरे पाटील यांनी शालेय जीवनातील इयता आठवीचे प्रगतीपुस्तक सोशल मिडियावर शेअर केले आहे. वार्षिक

बैलपोळानिमित्त बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जालना: राज्यात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलपोळा

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला !

पुणे : पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता अखेर मिटला आहे . काही मंडळांनी मानाच्या गणपतीच्या

सातारा : पावसाचा जोर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर, सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी अखेर