संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित, दोन्ही सभागृहात १५ विधेयकांना मंजुरी


नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थगित करण्यात आले. हे अधिवेशन सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सुरू झाले होते. यंदाच्या अधिवेशनात ३२ दिवसांत २१ बैठका झाल्या. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १४ विधेयके सादर करण्यात आली. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १२ आणि राज्यसभेत १५ विधेयकांना मंजुरी देण्यात आली.


पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला ठोस उत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केले. भारताच्या या यशस्वी कारवाईनंतर लोकसभेत २८ आणि २९ जुलै रोजी तर राज्यसभेत २९ आणि ३० जुलै रोजी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत चर्चा झाली. लोकसभेत १८ तास ४१ मिनिटे तर राज्यसभेत १६ तास २५ मिनिटे 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात चर्चा झाली. लोकसभेतील चर्चेत ७३ सदस्यांनी आणि राज्यसभेतील चर्चेमध्ये ६५ सदस्यांनी भाग घेतला. लोकसभेत पंतप्रधान मोदींनी आणि राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातल्या चर्चेला उत्तर दिले.


लोकसभेत १८ ऑगस्ट रोजी विकसित भारत २०४७ साठी अंतराळ कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेला पहिला भारतीय अंतराळवीर या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. पण विरोधकांनी सतत गोंधळ घातल्यामुळे ही चर्चा अपूर्णच राहिली. विरोधकांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात चर्चा करण्याऐवजी गोंधळ घालण्यावर जास्त भर दिला. यामुळे कामकाजाचा बराचसा वेळ वाया गेला. संसदेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये लोकसभेत ३१ टक्के आणि राज्यसभेत ३९ टक्केच कामकाज झाले.


Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात