संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित, दोन्ही सभागृहात १५ विधेयकांना मंजुरी


नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थगित करण्यात आले. हे अधिवेशन सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सुरू झाले होते. यंदाच्या अधिवेशनात ३२ दिवसांत २१ बैठका झाल्या. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १४ विधेयके सादर करण्यात आली. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १२ आणि राज्यसभेत १५ विधेयकांना मंजुरी देण्यात आली.


पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला ठोस उत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केले. भारताच्या या यशस्वी कारवाईनंतर लोकसभेत २८ आणि २९ जुलै रोजी तर राज्यसभेत २९ आणि ३० जुलै रोजी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत चर्चा झाली. लोकसभेत १८ तास ४१ मिनिटे तर राज्यसभेत १६ तास २५ मिनिटे 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात चर्चा झाली. लोकसभेतील चर्चेत ७३ सदस्यांनी आणि राज्यसभेतील चर्चेमध्ये ६५ सदस्यांनी भाग घेतला. लोकसभेत पंतप्रधान मोदींनी आणि राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातल्या चर्चेला उत्तर दिले.


लोकसभेत १८ ऑगस्ट रोजी विकसित भारत २०४७ साठी अंतराळ कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेला पहिला भारतीय अंतराळवीर या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. पण विरोधकांनी सतत गोंधळ घातल्यामुळे ही चर्चा अपूर्णच राहिली. विरोधकांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात चर्चा करण्याऐवजी गोंधळ घालण्यावर जास्त भर दिला. यामुळे कामकाजाचा बराचसा वेळ वाया गेला. संसदेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये लोकसभेत ३१ टक्के आणि राज्यसभेत ३९ टक्केच कामकाज झाले.


Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे