उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट, मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांना फोन

भाजपकडून एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या निवडणुकीची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क करून पाठिंब्याची मागणी केली मात्र या फडणवीसांच्या पाठिंब्याला पवारांनी नकार दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँगेसची बैठक झाली आणि या बैठीकीनंतर शरद पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


यावेळी शरद पवार यांनी आमच्या बैठका झाल्या असून सुदर्शन यांचा फॉर्मही भरलं असं पवार यांनी स्पष्ट केला आहे. उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी फडणवीसांनी मला फोन केला आणि राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी फडणवीसांनी मला विनंती केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय.


यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सी.पी. राधाकृष्णन हे आमच्या विचाराचे नाहीत असं म्हणत पवारांनी स्पष्ट नकार दिलाय. “उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मी फोन केला. मी निवेदन केलं की, महाराष्ट्राचे राज्यपाल जे मुंबईचे मतदार आहेत, त्यांना उपराष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं आहे.


उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पक्षीय नसते. त्या निवडणुकीसाठी व्हीप नसतो. महाराष्ट्राच्या अस्मितेला आपण मानता, त्यामुळे महाराष्ट्राचा एक मतदार या देशाचा उपराष्ट्रपती बनणार आहे. त्यांना समर्थन द्या अशी विनंती मी केली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ. शरद पवार म्हणाले की, “विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार ठरवलाय, आम्ही त्याच्यासोबत जाऊ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

वनजमीन शेतीसाठी भाड्याने देणे बेकायदेशीर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागपूर : वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या