मुंबईतील इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

मुबई: मुंबईत पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गिरगाव येथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर ही खळबळ उडाली. हा ईमेल थेट मंदिराच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवण्यात आला, त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलिसांना आणि बॉम्ब पथकाला याची माहिती दिली.


माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण मंदिर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने (BDDS) देखील शोध मोहीम राबवली. मंदिर परिसरात किंवा आजूबाजूला कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.


दरम्यान, ईमेलची चौकशी करताना सदर मेलमध्ये धमकीचे शब्द वापरले गेले असल्याची सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संभाव्य अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात सुरक्षा अधिक तैनात करण्यात आली आहे.



सुरक्षेत वाढ


गिरगाव येथील इस्कॉन मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत, धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली. या प्रकरणाचा तपास गांवदेवी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आणि सायबर सेलच्या मदतीने मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की सुरुवातीच्या तपासात कोणताही ठोस सुगावा लागला नाही, परंतु मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.


या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील