मुंबईतील इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

मुबई: मुंबईत पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गिरगाव येथील प्रसिद्ध इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर ही खळबळ उडाली. हा ईमेल थेट मंदिराच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवण्यात आला, त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलिसांना आणि बॉम्ब पथकाला याची माहिती दिली.


माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण मंदिर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने (BDDS) देखील शोध मोहीम राबवली. मंदिर परिसरात किंवा आजूबाजूला कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.


दरम्यान, ईमेलची चौकशी करताना सदर मेलमध्ये धमकीचे शब्द वापरले गेले असल्याची सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संभाव्य अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात सुरक्षा अधिक तैनात करण्यात आली आहे.



सुरक्षेत वाढ


गिरगाव येथील इस्कॉन मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत, धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली. या प्रकरणाचा तपास गांवदेवी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आणि सायबर सेलच्या मदतीने मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की सुरुवातीच्या तपासात कोणताही ठोस सुगावा लागला नाही, परंतु मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.


या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना

विजय मल्ल्या भारतात परतणारच नसतील, तर आम्ही याचिका का ऐकावी?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल मुंबई  : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने