संसदेत घुसखोरीचा प्रयत्न, भिंत ओलांडून गरुडद्वारापर्यंत पोहोचलेल्याला अटक


नवी दिल्ली : नव्या संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाला. एक व्यक्ती भिंत ओलाडून गरुडद्वारापर्यंत पोहोचली. अखेर सुरक्षा रक्षकांनी घुसखोराला अटक केली.


संसदेच्या संरक्षणाची जबाबदारी आता सीआयएसएफकडे सोपवण्यात आली आहे. अती महत्त्वाची इमारत असल्यामुळे संसदेच्या प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा यंत्रणेची बारीक नजर असणे अपेक्षित असते. यासाठी नव्या संसदेच्या आवारात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यांनी अज्ञात व्यक्तीच्या हालचालींची नोंद घेतल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई केली. गरुडद्वार परिसरातून संसदेच्या आवारात घुसखोरीचा प्रयत्न करताना बघून अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली.


याआधी १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हा हल्ला केला होता. या घटनेत दिल्ली पोलिसांचे सहा कर्मचारी, संसदेच्या सुरक्षा यंत्रणेचे दोन कर्मचारी आणि संसद परिसरातल्या उद्यानाचा एक माळी अशा नऊ जणांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा पथकाने हल्ला करणाऱ्या पाच अतिरेक्यांना ठार केले होते. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पण संसदेची दोन्ही सभागृह नव्या इमारतीत स्थलांतरित केल्यानंतर संसदेच्या आवारात कायदा हाती घेण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. याआधी २०२३ मध्ये कृषी कायद्यांना विरोध म्हणून संसदेत प्रेक्षक म्हणून आलेल्या चौघांनी रंगीत धूर सोडून निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी संसदेत धूर करणाऱ्या चौघांना सुरक्षा पथकाने अटक केली होती. या घटनेनंतर थेट आता २०२५ मध्ये संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. यामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्था हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


यावेळी संसदेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव रामा असे आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या रामाची कसून चौकशी सुरू आहे. प्रथमदर्शनी रामाचे वर्तन विक्षिप्त असल्याचे मत दिल्ली पोलिसांच्या जवानांनी व्यक्त केले आहे. यामुळे रामाला काही मानसिक त्रास आहे का याचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामाला शुक्रवारी पहाटे ५.५० च्या सुमारास घुसखोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या