मिठी नदीच्या घोटाळ्यातील तिसरा आरोपी अटकेत!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चालू तपासात एक मोठी प्रगती झाली आहे. मुंबई पोलिसांच्या 'आर्थिक गुन्हे शाखेने' आज सकाळी बोरीवली येथील कंत्राटदार शेरसिंग राठोडला अटक केली. त्याला नंतर 'एस्प्लेनेड' न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या घोटाळ्यातील ही तिसरी अटक आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राठोड हा नदीतील गाळ काढण्याच्या कामात वाढीव बिले आणि इतर अनियमिततांमध्ये गुंतलेला होता, असा त्याच्यावर आरोप आहे. या घोटाळ्यात अनेक कंत्राटदार आणि नागरी अधिकारी सहभागी असल्याचा आरोप असून, 'ई.ओ.डब्ल्यू.'कडून 'आर्थिक व्यवहारांच्या' तपासणीसाठी सक्रिय तपास सुरू आहे आणि गैरवापर केलेल्या निधीच्या लाभार्थ्यांची ओळख पटवली जात आहे.



सूत्रांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे. 'अंमलबजावणी संचालनालय' देखील नदीच्या साफसफाई प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा समांतर तपास करत आहे. याआधी 'ईडी'ने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या घरी छापा टाकला होता आणि 'वोडार इंडिया लिमिटेड'च्या अटकेत असलेल्या आरोपी केतन कदमसोबतच्या त्याच्या आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांच्या 'आर्थिक व्यवहारा'ची तपासणी केली होती.


'व्हिर्गो स्पेशालिटीज प्रा. लि.'चा एक आरोपी जय जोशी याला स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जोशीने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये नेदरलँड्समधून ८ कोटी रुपयांना आयात केलेली एक मशीन पुरवली होती, जी या प्रकल्पात वापरली गेली.

Comments
Add Comment

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

मुंबई : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला.

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या