रत्नागिरीत भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, एक गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हा अपघात १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत वसंत धोत्रे (वय ४५, रा. नातुनगर, खेड) हे आपल्या कामावरून परत येत होते. खवटी नाक्यावरील राम पवार यांच्या सलूनमध्ये दाढी करून ते घरी जाण्यासाठी महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने त्यांना धडक दिली.


या धडकेत धोत्रे यांच्या डाव्या हाताच्या बाहूला आणि उजव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. महामार्गावर पादचाऱ्यांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

'मी खूप चपला झिजवल्या!'तृप्ती डिमरीने सांगितला बॉलिवूडमधील संघर्षाचा प्रवास

'ॲनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी म्हणते: इंडस्ट्रीत गॉडफादर नसणाऱ्या प्रत्येकासाठी संघर्ष असतो मुंबई: 'ॲनिमल'

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

दसरा सणात मुलांचाही सहभाग महत्त्वाचा!

मुंबई : दसरा म्हणजे विजयाचा, उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस. पण आजच्या काळात या सणाचा अर्थ फक्त सुट्टी, नवीन कपडे आणि

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

Mithun Manhas: अनपेक्षित! मिथुन मन्हास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी एक आश्चर्यकारक नाव समोर आलं आहे. दिग्गजांची नावं

पूरग्रस्तांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!

​पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार! लातूर : अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने