रत्नागिरीत भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, एक गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी नाका येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावरून चालणाऱ्या एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हा अपघात १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत वसंत धोत्रे (वय ४५, रा. नातुनगर, खेड) हे आपल्या कामावरून परत येत होते. खवटी नाक्यावरील राम पवार यांच्या सलूनमध्ये दाढी करून ते घरी जाण्यासाठी महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने त्यांना धडक दिली.


या धडकेत धोत्रे यांच्या डाव्या हाताच्या बाहूला आणि उजव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. महामार्गावर पादचाऱ्यांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

बीबीसीवर खोटी बातमी, महासंचालक आणि न्यूज चीफचा तडकाफडकी राजीनामा

अमेरिका : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी एक भाषण केले होते. हे भाषण एडिट करुन

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी उद्या होणार सुनावणी, अभियंत्यांची चूक नाही असा वकिलांचा दावा!

ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्यांबाबत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा

असीम मुनीर यांना विशेष अधिकार देण्यावरून पाकिस्तानात विरोधकांचे देशव्यापी आंदोलन

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २७ व्या संविधान सुधारणा विधेयकामुळे तणाव निर्माण झाला आहे. संविधान सुधारण्यानंतर