मुंबई : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीत काय काय झालं? राज ठाकरेंनी सर्व सांगितलं

राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. 45 मिनिटं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन मुंबईमधील सर्व समस्यांचा पाढा वाचला. राज ठाकरे आणि मुखयमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्यात 45 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राज ठाकरेंनी वाहतूक, पार्किंगबाबत फडणवीसांना आराखडा दिला. तसंच इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं राज ठाकरे म्हणाले.
मुंबईमध्ये अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे.


रस्ते बनवणं हा धंदा आहे. टेंडर काढायची, रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत. खराब झाले की लगेच खड्डे बुजवायचं टेंडर काढायची. परत रस्ता बांधण्यासाठी टेंडर काढलं जातं. हे अनेकवर्ष सुरू आहे. याला लोक त्रासलेली आहेत. पण जे करतात त्यांनाच परत निवडून दिलं जात आहे. यांना खड्डात घातलं तरी लोक मतदान करणार आहेत, तर रस्ते चांगले मिळणारच नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


नुसत्या इमारती उंच बांधल्या जात आहेत. पण खाली जागा काय? वाहनं नियंत्रित करणं गरजेचं आहे, बाहेरुन येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत असंही राज ठाकरे म्हटले.


रोज या शहरांवर माणसं येऊन आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही, केवळ इमारती वर उंच हो आहेत. ही येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत, बाहेरच्या राज्यातील, बाहेरची शहरं विकसित करणं गरजेचं आहे. बाहेरची माणसं येणं थांबवली हवीत. जेवढं शक्य आहे करणं गरजेचं आहे. कायद्याला न जुमानणं वाढलं आहे, शिस्त लागलीच पाहिजे वाहतूककोंडी प्रचंड वाढली आहे. वाहतुकीबाबत शिस्त लागतीच पाहिजेच, मुंबईत बेशिस्तपणा, कायद्याला न जुमानणं वाढत चाललं आहे. हाताबाहेर गेलं तर कोणीच काही करू शकत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


400 मीमी पाऊस पडला, राज्य सरकारने ह्यावर काम केलं नाही. कबुतर , हत्ती या विषयांमध्ये आपण एवढं अडकलोय की इतर गोष्टींवर लक्षच राहिलं नाही. लोकांना पार्किंगबाबत शिस्त लावणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातील लोकांना काहीच माहिती नाही, या शहरात कशी पार्किंग केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना मी एक आराखडा दिलाय, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. काही उपाययोजना कराव्या लागतात.


पार्किंगसाठी आणि नो पार्किंगसाठी काही रंग असले पाहिजेत, असं राज ठाकरेंनी सांगितले.


Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ