मुंबई : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीत काय काय झालं? राज ठाकरेंनी सर्व सांगितलं

राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. 45 मिनिटं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन मुंबईमधील सर्व समस्यांचा पाढा वाचला. राज ठाकरे आणि मुखयमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्यात 45 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राज ठाकरेंनी वाहतूक, पार्किंगबाबत फडणवीसांना आराखडा दिला. तसंच इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं राज ठाकरे म्हणाले.
मुंबईमध्ये अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे.


रस्ते बनवणं हा धंदा आहे. टेंडर काढायची, रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत. खराब झाले की लगेच खड्डे बुजवायचं टेंडर काढायची. परत रस्ता बांधण्यासाठी टेंडर काढलं जातं. हे अनेकवर्ष सुरू आहे. याला लोक त्रासलेली आहेत. पण जे करतात त्यांनाच परत निवडून दिलं जात आहे. यांना खड्डात घातलं तरी लोक मतदान करणार आहेत, तर रस्ते चांगले मिळणारच नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


नुसत्या इमारती उंच बांधल्या जात आहेत. पण खाली जागा काय? वाहनं नियंत्रित करणं गरजेचं आहे, बाहेरुन येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत असंही राज ठाकरे म्हटले.


रोज या शहरांवर माणसं येऊन आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही, केवळ इमारती वर उंच हो आहेत. ही येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत, बाहेरच्या राज्यातील, बाहेरची शहरं विकसित करणं गरजेचं आहे. बाहेरची माणसं येणं थांबवली हवीत. जेवढं शक्य आहे करणं गरजेचं आहे. कायद्याला न जुमानणं वाढलं आहे, शिस्त लागलीच पाहिजे वाहतूककोंडी प्रचंड वाढली आहे. वाहतुकीबाबत शिस्त लागतीच पाहिजेच, मुंबईत बेशिस्तपणा, कायद्याला न जुमानणं वाढत चाललं आहे. हाताबाहेर गेलं तर कोणीच काही करू शकत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


400 मीमी पाऊस पडला, राज्य सरकारने ह्यावर काम केलं नाही. कबुतर , हत्ती या विषयांमध्ये आपण एवढं अडकलोय की इतर गोष्टींवर लक्षच राहिलं नाही. लोकांना पार्किंगबाबत शिस्त लावणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातील लोकांना काहीच माहिती नाही, या शहरात कशी पार्किंग केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना मी एक आराखडा दिलाय, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. काही उपाययोजना कराव्या लागतात.


पार्किंगसाठी आणि नो पार्किंगसाठी काही रंग असले पाहिजेत, असं राज ठाकरेंनी सांगितले.


Comments
Add Comment

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये वाढ!

बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून

कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये; मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले... लातूर: मनोज

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन