मुंबई : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीत काय काय झालं? राज ठाकरेंनी सर्व सांगितलं

राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. 45 मिनिटं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. राज ठाकरे यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन मुंबईमधील सर्व समस्यांचा पाढा वाचला. राज ठाकरे आणि मुखयमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्यात 45 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राज ठाकरेंनी वाहतूक, पार्किंगबाबत फडणवीसांना आराखडा दिला. तसंच इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं राज ठाकरे म्हणाले.
मुंबईमध्ये अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे.


रस्ते बनवणं हा धंदा आहे. टेंडर काढायची, रस्ते बांधायचे ते खराब झालेच पाहिजेत. खराब झाले की लगेच खड्डे बुजवायचं टेंडर काढायची. परत रस्ता बांधण्यासाठी टेंडर काढलं जातं. हे अनेकवर्ष सुरू आहे. याला लोक त्रासलेली आहेत. पण जे करतात त्यांनाच परत निवडून दिलं जात आहे. यांना खड्डात घातलं तरी लोक मतदान करणार आहेत, तर रस्ते चांगले मिळणारच नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


नुसत्या इमारती उंच बांधल्या जात आहेत. पण खाली जागा काय? वाहनं नियंत्रित करणं गरजेचं आहे, बाहेरुन येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत असंही राज ठाकरे म्हटले.


रोज या शहरांवर माणसं येऊन आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाही, केवळ इमारती वर उंच हो आहेत. ही येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत, बाहेरच्या राज्यातील, बाहेरची शहरं विकसित करणं गरजेचं आहे. बाहेरची माणसं येणं थांबवली हवीत. जेवढं शक्य आहे करणं गरजेचं आहे. कायद्याला न जुमानणं वाढलं आहे, शिस्त लागलीच पाहिजे वाहतूककोंडी प्रचंड वाढली आहे. वाहतुकीबाबत शिस्त लागतीच पाहिजेच, मुंबईत बेशिस्तपणा, कायद्याला न जुमानणं वाढत चाललं आहे. हाताबाहेर गेलं तर कोणीच काही करू शकत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


400 मीमी पाऊस पडला, राज्य सरकारने ह्यावर काम केलं नाही. कबुतर , हत्ती या विषयांमध्ये आपण एवढं अडकलोय की इतर गोष्टींवर लक्षच राहिलं नाही. लोकांना पार्किंगबाबत शिस्त लावणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातील लोकांना काहीच माहिती नाही, या शहरात कशी पार्किंग केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना मी एक आराखडा दिलाय, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. काही उपाययोजना कराव्या लागतात.


पार्किंगसाठी आणि नो पार्किंगसाठी काही रंग असले पाहिजेत, असं राज ठाकरेंनी सांगितले.


Comments
Add Comment

Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख

Sadanand Date : सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक? महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई : राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून,

Devendra Fadanvis : 'राजकीय पर्यावरणवाद्यां'कडून कुंभमेळ्याच्या आयोजनात खोडा घालण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप!

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता भव्यदिव्य आयोजन करणार मुंबई : “नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून