स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले !

कॅनालायीस अहवालातील माहिती समोर


प्रतिनिधी: अमेरिकेला स्मार्टफोन निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. असा अहवाल कॅनालायीस (Canalys) रिसर्च कंपनीने प्रसिद्ध केला आहे. आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये ही संबंधित नवी माहिती दिली आहे. पोस्टनुसार, मेक इन इंडिया, पीए लआय (Production Linked Incentive PLI) सारख्या योजनांच्या पाठबळामुळे ही वाढ झाली आहे. एप्रिल ते जून महिन्यात चीनलाही स्मार्टफोन निर्यातीत मागे टाकण्यात आल्याचा दावा अहवालात केला गेला आहे.अहवालातील माहितीवर, मेड इन इंडियात उत्पादन वाढीचा फायदा निर्यातीत झाला. ज्यामुळे प्रत्यक्षात एप्रिल ते जून २०२५ मध्ये युएसमध्ये आयातीतील भारतीय शिपमेंटमध्ये ४४% वाढ झाली आहे. याचवेळी चीनच्या अमेरिकेतील स्मार्टफोन निर्यातीत ६१% टक्के घसरण झाली आहे ‌जी पूर्वी २५% मागील वर्षाच्या तिमाहीत होती. भारतीय स्मार्टफोन निर्यातीत मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत मात्र १३% वाढ झाली आहे.


भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील भरीव कामगिरीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन निर्यातीचा व्यापार भारतात वाढला आहे. गेल्या चार वर्षांत स्मार्टफोन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सरकारच्या पीएलआय, सब्सिडी अशा योजनांमुळे निर्यातीत वाढ होत असल्याचे याआधीही स्पष्ट झाले होते. मागील महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने या वाढीचा विस्तृत प्रगतीचा आलेख आपल्या अभ्यास अहवालात छापला होता. त्यामुळे कॅनालायीस रिसर्च कंपनीच्या रिसर्चमुळे ही निर्यातीतील वाढ भविष्यातही होऊ शकते हे अधोरेखित झाले‌. आर्थिक वर्ष २०१४- २०१५ व आर्थिक वर्ष २०२४-२५ या दरम्यान भारतीय औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल उत्पादनात विशाल परिवर्तन (Transformation) झाले होते.


केवळ मोबाईलचा विचार केल्यास, स्मार्टफोन उत्पादन १८००० कोटींवरून ही निर्यात ५.४५ लाख कोटींवर पोहोचले होते. स्मार्टफोन निर्यातीतही १५०० कोटींवरून वाढ होत २ लाख कोटी मुल्यांकनावर वाढ झाली आहे. एकूणच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उत्पादन श्रेणीत १.९ लाख कोटीवरून ५.४५ लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मोबाईल युनिट उत्पादनात तब्बल १५०% वाढ गेल्या १० वर्षात झाली. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये सरकारी आकडेवारीनुसार भारतात ७५% स्मार्टफोन आयात केले जात होते आता आर्थिक वर्ष २०२४-२०२५ कालावधीत केवळ मोबाईल आयात ०.०२% वर कायम आहे.

Comments
Add Comment

BMC News : प्रत्येक विभागस्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे स्पष्ट निर्देश मुंबई : मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी संपूर्ण

Ladki Bahin, Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'लाडकी बहीण' चित्रपटाचा टीझर लॉन्च

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या

US And Iran War : पाकिस्तानने अमेरिकेच्या नाकेबंदी दरम्यान इराणसाठी सहा भूमार्ग केले खुले

वॉशिंग्टन : पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्य मध्यस्थाची भूमिका बजावत

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

Mumbai-Goa Express Way : कोकणकरांचा प्रवास आता होणार सुसाट; महामार्ग लवकरच तयार होण्याच्या मार्गावर

मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे आणि बहुतेक जणांच्या नजरा या कोकणाकडे वळल्या आहेत, त्यामुळे गावच्या वाटा

Neelam Gorhe Shivsena : नीलम गोऱ्हेना शिवसेनेतच विरोध? तरीही शिंदेनी दिली उमेदवारी; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकीची धांदल आता सुरु झाली आहे. आजचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस