मुंबई, कोकणनंतर आता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली


मुंबई : मुंबई तसेच कोकणाला पावसाने झोडपल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस धुमाकूळ घालत आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्याची पाण्याची पातळी ४२ फूट ८ इंट आहे. तसेच जिल्ह्यातील ७९ बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे तेथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


गेल्या दोन दिवसांत पावसाने मुंबई, कोकणला चांगलेच झोडपले होते. या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापुरात प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितले जात आहे.



पंढरपूरमध्ये पूरपरिस्थिती


दुसरीकडे उजनी आणि वीर या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीचे पाणी पात्रात शिरल्याने जवळील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.



सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर


सांगली जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. तेथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी ४२ फुटांवर पोहोचली आहे.


Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी