भांडुपमध्ये पावसात घडली धक्कादायक घटना, हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्याचाबाबत घडली दुर्दैवी घटना


मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना भांडुपमध्ये धक्कादायक घटना घडली. हा प्रकार भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला. विजेच्या खुल्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे १७ वर्षांच्या दीपक पिल्ले याचा मृत्यू झाला. तो भर पावसात हेडफोनवर गाणी ऐकत स्वतःच्याच मर्जीने निवांत चालला होता. परिसरात महावितरण कंपनीची एक विजेची तार खुली होती. या तारेपासून सावध राहण्यासाठी स्थानिकांनी हाका मरुन सूचना दिल्या. पण हेडफोनवर गाणी ऐकत असल्यामुळे दीपकने धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्षच दिले नाही. तो स्वतःच्या धुंदीत चालत पुढे गेला आणि दुर्दैवी घटना घडली.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस पडत होता. महावितरणची एक उच्च दाबाची विजेची तार खुली पडली होती. या संदर्भात महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. पण त्यांचे तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले नव्हते. यामुळे शॉक लागण्याचा धोका होता. जे कोणी तार खुली पडलेल्या भागातून जात होते त्यांना स्थानिक सावध करत होते. पण १७ वर्षांचा दीपक पिल्ले जेव्हा त्या भागात आला तेव्हा तो हेडफोनवर गाणी ऐकत होता. यामुळे स्थानिकांच्या इशाऱ्याकडे त्याचे लक्षच नव्हते. वारंवार हाका मारुन त्याला सावध करण्याचा प्रयत्न झाला. पण दीपक त्याच्या तंद्रीत पुढे गेला.


गाणी ऐकत स्वतःच्या धुंदीत चालत असलेला दीपक पिल्ले अखेर खुल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आला. शॉक लागल्यामुळे दीपकचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी दुःख व्यक्त केले.


Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस