भांडुपमध्ये पावसात घडली धक्कादायक घटना, हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्याचाबाबत घडली दुर्दैवी घटना


मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना भांडुपमध्ये धक्कादायक घटना घडली. हा प्रकार भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला. विजेच्या खुल्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे १७ वर्षांच्या दीपक पिल्ले याचा मृत्यू झाला. तो भर पावसात हेडफोनवर गाणी ऐकत स्वतःच्याच मर्जीने निवांत चालला होता. परिसरात महावितरण कंपनीची एक विजेची तार खुली होती. या तारेपासून सावध राहण्यासाठी स्थानिकांनी हाका मरुन सूचना दिल्या. पण हेडफोनवर गाणी ऐकत असल्यामुळे दीपकने धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्षच दिले नाही. तो स्वतःच्या धुंदीत चालत पुढे गेला आणि दुर्दैवी घटना घडली.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस पडत होता. महावितरणची एक उच्च दाबाची विजेची तार खुली पडली होती. या संदर्भात महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. पण त्यांचे तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले नव्हते. यामुळे शॉक लागण्याचा धोका होता. जे कोणी तार खुली पडलेल्या भागातून जात होते त्यांना स्थानिक सावध करत होते. पण १७ वर्षांचा दीपक पिल्ले जेव्हा त्या भागात आला तेव्हा तो हेडफोनवर गाणी ऐकत होता. यामुळे स्थानिकांच्या इशाऱ्याकडे त्याचे लक्षच नव्हते. वारंवार हाका मारुन त्याला सावध करण्याचा प्रयत्न झाला. पण दीपक त्याच्या तंद्रीत पुढे गेला.


गाणी ऐकत स्वतःच्या धुंदीत चालत असलेला दीपक पिल्ले अखेर खुल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आला. शॉक लागल्यामुळे दीपकचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी दुःख व्यक्त केले.


Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)