भांडुपमध्ये पावसात घडली धक्कादायक घटना, हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्याचाबाबत घडली दुर्दैवी घटना


मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना भांडुपमध्ये धक्कादायक घटना घडली. हा प्रकार भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला. विजेच्या खुल्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे १७ वर्षांच्या दीपक पिल्ले याचा मृत्यू झाला. तो भर पावसात हेडफोनवर गाणी ऐकत स्वतःच्याच मर्जीने निवांत चालला होता. परिसरात महावितरण कंपनीची एक विजेची तार खुली होती. या तारेपासून सावध राहण्यासाठी स्थानिकांनी हाका मरुन सूचना दिल्या. पण हेडफोनवर गाणी ऐकत असल्यामुळे दीपकने धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्षच दिले नाही. तो स्वतःच्या धुंदीत चालत पुढे गेला आणि दुर्दैवी घटना घडली.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस पडत होता. महावितरणची एक उच्च दाबाची विजेची तार खुली पडली होती. या संदर्भात महावितरणकडे तक्रार करण्यात आली होती. पण त्यांचे तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले नव्हते. यामुळे शॉक लागण्याचा धोका होता. जे कोणी तार खुली पडलेल्या भागातून जात होते त्यांना स्थानिक सावध करत होते. पण १७ वर्षांचा दीपक पिल्ले जेव्हा त्या भागात आला तेव्हा तो हेडफोनवर गाणी ऐकत होता. यामुळे स्थानिकांच्या इशाऱ्याकडे त्याचे लक्षच नव्हते. वारंवार हाका मारुन त्याला सावध करण्याचा प्रयत्न झाला. पण दीपक त्याच्या तंद्रीत पुढे गेला.


गाणी ऐकत स्वतःच्या धुंदीत चालत असलेला दीपक पिल्ले अखेर खुल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आला. शॉक लागल्यामुळे दीपकचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी दुःख व्यक्त केले.


Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या