बांगलादेशने आयात बंदी हटवल्यानंतर कांद्याच्या दरात अल्पशी सुधारणा

लासलगाव : बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीवरील बंदी हटवल्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अत्यंत अल्पशी सुधारणा झाली आहे.मात्र ही दर वाढ शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे


बांगलादेशने काही विशिष्ट प्रमाणातच कांद्याच्या आयातीस परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे तसेच तेथील शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठविलेला कांदा काही प्रमाणात शिल्लक आहे.तो संपल्यानंतर भारतीय कांद्याच्या निर्यातीला गती येण्याची आशा निर्यातदार बाळगून आहेत. सध्या जरी २०० टन कांदा पाठवण्याची परवानगी मिळाली असली तरी,येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, जाणकारांच्या मते, जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही,तोपर्यंत कांद्याच्या दरात मोठी सुधारणा होणे कठीण आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी १७ हजार ५०० क्विंटल कांद्याची बम्पर आवक झाली.कांद्याला कमीत कमी ७००/- रुपये,जास्तीत जास्त १८०१/- रुपये तर सरासरी १६४०/- रुपये प्रतीक्विंटल बाजार भाव मिळाला तर गेल्या आठवड्यात शनिवारी ८ हजार ६२४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती.बाजार भाव कमीत कमी ६००/- रुपये, जास्तीत जास्त १७२५/- रुपये तर सरासरी १५७५/- रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले होते,म्हणजे सरासरी दरात फक्त 65 रुपये प्रति क्विंटल अशी अल्पशी वाढ झाली आहे.


बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.भारत दरवर्षी जेवढा एकूण कांदा निर्यात करतो, त्यातील २० टक्के कांदा एकट्या बांगलादेशमध्ये जातो या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे त्यामुळे फेब्रुवारीपासून निर्यातीत अडचणी आल्या होत्या.नंतर कांद्याची आयात त्यांच्याकडून थांबविली गेली.आता कांदा संपुष्टात येऊ लागल्याने बांंगलादेशने आयातीला परवानगी दिली असली तरी निर्यात वेग पकडण्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. यासंदर्भात लासलगावातील कांदा निर्यातदार अफजल शेख म्हणाले की,


बांगलादेश ने कांद्याची आयात बंदी हटवल्यानंतर लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अल्पशी वाढ झाली आहे तसेच बांगलादेशने काही विशिष्ट प्रमाणातच आयातीस परवानगी दिली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही,तोपर्यंत कांद्याच्या दरात मोठी सुधारणा होणे कठीण असल्याचे शेख यांनी सांगितले. तर कांदा उत्पादक संतोष पानगव्हाणे म्हणाले की,


सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावातून कांदा उत्पादन करण्यासाठी झालेला खर्चही फिटत नाही परिणामी कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहे.यंदा महाराष्ट्रासह इतर कांदा उत्पादक राज्यात कांद्याचे भरघोस उत्पादन झालेले आहे त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीस प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून भारतीय कांद्याची निर्यात वाढेल व शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे अधिकचे पडतील असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची

Hinjewadi Accident News : डंपरच्या जोरदार धडकेत बापलेकीची ताटातूट! मुलीचा जागीच मृत्यू, वडील जखमी; हिंजवडी हादरले

हिंजवडी : पुण्यातील हिंजवडी आयटी परिसरात (Hinjewadi Accident News) अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, काल

Suraj Chavan New House : 'गुलिगत किंग' बनला 'गृहस्थ'! भव्य हॉल, आकर्षक इंटिरिअर अन्... सूरज चव्हाणच्या हक्काच्या घराची 'पहिली झलक' पहाचं!

मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय नाव म्हणजे सूरज चव्हाण. आपल्या खास "झापूक

Ladki Bahin Yojana E- KYC : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! E-KYC ला ४३ दिवसांची मुदतवाढ, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? वाचा

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojna) अंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेसाठी सरकारने

इलेक्ट्रिक एसटी बसला राज्यातील द्रुतगती मार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याचा ई-शिवाई बसला फायदा मुंबई  : राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसला द्रुतगती