Jalgoan News : शेतात कामाला गेले अन् ५ जीव परतलेच नाहीत, एरंडोल तालुक्यातील भीषण घटना”, काय घडलं नेमकं?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी गाव हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गावाजवळील शेतात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण आपल्या शेताकडे जात असताना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये स्त्री-पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खेडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



विजेच्या धक्क्याने कुटुंब उजाडलं


जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी गावात एकाच कुटुंबावर भीषण आपत्ती कोसळली आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या या कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे गावभर हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला (वय ४० वर्षे), एक पुरुष (वय ४५ वर्षे), सहा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. हे कुटुंब आदिवासी पावरा समाजातील असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत त्याच कुटुंबातील तीन वर्षांची एक लहानगी चमत्कारिकरीत्या बचावली असून त्यामुळे या घटनेत थोडा दिलासा मिळाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे खेडी परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण गाव दु:खाच्या छायेत बुडाले आहे.



नेमकं काय घडलं?


अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला. कालिका फर्निचर या दुकानात मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन निरागस मुलांचाही समावेश आहे. घटनेची प्राथमिक माहिती अशी की, दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, सोफा, कूलर, फ्रीज आणि इतर वस्तू असल्याने आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीमुळे धुराचे मोठे लोळ पसरले आणि वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबाला झोपेतच श्वास गुदमरून कुटुंबातील प्रमुख मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (३८), दोन लहान मुले अंश (१०) व चैतन्य (७) आणि वृद्ध आजी सिंधुबाई चंद्रकांत रासने (८५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण नेवासा फाटा परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वजण हतबल झाले आहेत. पाच निरपराध जीव एका क्षणात आगीच्या धुराने हिरावून घेतल्याने गावात हृदयद्रावक वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व