Jalgoan News : शेतात कामाला गेले अन् ५ जीव परतलेच नाहीत, एरंडोल तालुक्यातील भीषण घटना”, काय घडलं नेमकं?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी गाव हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गावाजवळील शेतात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह आढळून आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण आपल्या शेताकडे जात असताना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये स्त्री-पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असल्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खेडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



विजेच्या धक्क्याने कुटुंब उजाडलं


जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी गावात एकाच कुटुंबावर भीषण आपत्ती कोसळली आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या या कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे गावभर हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला (वय ४० वर्षे), एक पुरुष (वय ४५ वर्षे), सहा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. हे कुटुंब आदिवासी पावरा समाजातील असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत त्याच कुटुंबातील तीन वर्षांची एक लहानगी चमत्कारिकरीत्या बचावली असून त्यामुळे या घटनेत थोडा दिलासा मिळाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे खेडी परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण गाव दु:खाच्या छायेत बुडाले आहे.



नेमकं काय घडलं?


अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला. कालिका फर्निचर या दुकानात मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन निरागस मुलांचाही समावेश आहे. घटनेची प्राथमिक माहिती अशी की, दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, सोफा, कूलर, फ्रीज आणि इतर वस्तू असल्याने आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीमुळे धुराचे मोठे लोळ पसरले आणि वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबाला झोपेतच श्वास गुदमरून कुटुंबातील प्रमुख मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल मयूर रासने (३८), दोन लहान मुले अंश (१०) व चैतन्य (७) आणि वृद्ध आजी सिंधुबाई चंद्रकांत रासने (८५) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण नेवासा फाटा परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वजण हतबल झाले आहेत. पाच निरपराध जीव एका क्षणात आगीच्या धुराने हिरावून घेतल्याने गावात हृदयद्रावक वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार