महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका, 'या' निवडणुकीत पराभव


दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही.


बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली.


मुंबई: दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे.


बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या, तर भाजपच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या 'उत्कर्ष' पॅनलला मात्र भोपळाही फोडता आला नाही.



​काय आहे निकाल:-


​शशांक राव पॅनल: 14


​प्रसाद लाड पॅनल: 07


मनसे - शिवसेना: 00


१८ ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार होता. मात्र मुंबईत मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने मजमोजणीस विलंब झाला. अखेर रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला जबर धक्का बसला आहे.


बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. हा विजय म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांनी युनियनने केलेल्या कामाला दिलेली खरी पोचपावती आहे. ​गेल्या अनेक वर्षांत शिवसेनेने बेस्टमध्ये जे खाजगीकरण आणले आणि कामगारविरोधी धोरणे राबवली, त्याबद्दलची कर्मचाऱ्यांची चीड या निकालातून दिसून येते. म्हणूनच त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

मागील २-३ वर्षांत मराठा समाजाला जास्त निधी मिळाला

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मुंबई : ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी

मुंबईत अग्निवीरानेच रायफल चोरली, कारण काय? दोघांना तेलंगणात अटक

मुंबई : मुंबईतील नेव्ही नगरमध्ये ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीराची (नेव्ही कर्मचारी) रायफल चोरणाऱ्या दोन फरार

दसरा मेळाव्यासाठी मुंबई मनपाकडून ठाकरे गटाला परवानगी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी

गोरेगावच्या शालिमार इमारतीत भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई: गोरेगाव येथील एस. व्ही. रोडवरील एका इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन

दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सागरी प्रदर्शन व परिषदेचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

पुढील तीन दिवसात नवनवीन भागीदारी आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन   मुंबई:

अजितदादांना झालेय तरी काय? आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द...

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार हे काल पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीत