महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका, 'या' निवडणुकीत पराभव


दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही.


बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली.


मुंबई: दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे.


बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या, तर भाजपच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या 'उत्कर्ष' पॅनलला मात्र भोपळाही फोडता आला नाही.



​काय आहे निकाल:-


​शशांक राव पॅनल: 14


​प्रसाद लाड पॅनल: 07


मनसे - शिवसेना: 00


१८ ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार होता. मात्र मुंबईत मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने मजमोजणीस विलंब झाला. अखेर रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला जबर धक्का बसला आहे.


बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. हा विजय म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांनी युनियनने केलेल्या कामाला दिलेली खरी पोचपावती आहे. ​गेल्या अनेक वर्षांत शिवसेनेने बेस्टमध्ये जे खाजगीकरण आणले आणि कामगारविरोधी धोरणे राबवली, त्याबद्दलची कर्मचाऱ्यांची चीड या निकालातून दिसून येते. म्हणूनच त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

पुढील तीन ते चार दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ६० लाख हेक्टरचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत ने

महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा श्वानांची चिंता!

रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष

जय शहांचे नाव घेत शिंदे सेनेवर टीका करणा-या ठाकरेंच्या नेत्याला भाजपने सोलून काढले

मुंबई: दसरा (विजयादशमी) मेळाव्याच्या आयोजनावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना जय शहा

उद्धव गटाने दसरा मेळावा सोनिया गांधींच्या अंगणात घ्यावा

मुंबई: त्यांचे हाय कमांड दिल्लीत बसतात आणि त्यांच्याकडे विमान भरण्याइतकेही समर्थक नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूची फुले महागली

परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान नवी मुंबई : दसरा सणासाठी झेंडू, आंब्याच्या डहाळ्या,

शेतकरी खचून गेलेत, पण सरकार त्यांच्या पाठीशी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार

पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचे आश्वासन मुंबई: मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह सोलापूरमध्ये