ऐन पावसात अ‍ॅप बेस्ड कॅब सेवांनी केली प्रवाशांची लूट


मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती. ठिकठिकाणी बेस्टच्या बस पाण्यात अडकल्या होत्या. या परिस्थितीत काही नागरिकांनी प्रवासाचा सुरक्षित पर्याय म्हणून अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण या गरजू प्रवाशांना कंपन्यांनी लुबाडल्याची बाब समोर आली आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाद्वारे या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत हजारो रुपयांचे भाडे अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आकारले होते. कल्याण ते सीएसएमटी / चर्चगेटसाठी २,४०० रुपये आणि सीएसएमटी ते ठाणेसाठी १,५०० रुपयांची आकारण्याचे प्रकार घडले. यामुळे पावसाने त्रासलेल्या नागरिकांना सुरक्षित प्रवासाकरिता खिसा रिकामा करण्याची वेळ आली होती.


मिठी नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे अनेक वाहने अडकली होतो. अंधेरी, कुर्ला घाटकोपर रोड मरोळ नाका, बीपीटी रोडवरील कॉटन फाटक परिसरात दोन फूट पाणी साचले होते. पेडर रोड, महालक्ष्मी मंदिर आणि ताडदेव परीसरात दिड फूट पाणी साचले होते. यामुळे रस्ते वाहतूक बंद होती. रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती त्यामुळे अनेकांनी लांबच्या प्रवासाकरिता अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण परिस्थितीचा गैरफायदा घेत कॅबवाल्याने थेट दिड ते अडीच हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले.


एरव्ही बक्कळ नफा कमवणाऱ्या ॲप आधारित कॅब सेवांनी किमान नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ना नफा ना तोटा दरात सेवा द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. वाजवी दरापेक्षा अधिक पैसे आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर सरकारनेच नियमावली करुन कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली.


Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)