ऐन पावसात अ‍ॅप बेस्ड कॅब सेवांनी केली प्रवाशांची लूट

  34


मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती. ठिकठिकाणी बेस्टच्या बस पाण्यात अडकल्या होत्या. या परिस्थितीत काही नागरिकांनी प्रवासाचा सुरक्षित पर्याय म्हणून अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण या गरजू प्रवाशांना कंपन्यांनी लुबाडल्याची बाब समोर आली आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाद्वारे या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत हजारो रुपयांचे भाडे अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आकारले होते. कल्याण ते सीएसएमटी / चर्चगेटसाठी २,४०० रुपये आणि सीएसएमटी ते ठाणेसाठी १,५०० रुपयांची आकारण्याचे प्रकार घडले. यामुळे पावसाने त्रासलेल्या नागरिकांना सुरक्षित प्रवासाकरिता खिसा रिकामा करण्याची वेळ आली होती.


मिठी नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे अनेक वाहने अडकली होतो. अंधेरी, कुर्ला घाटकोपर रोड मरोळ नाका, बीपीटी रोडवरील कॉटन फाटक परिसरात दोन फूट पाणी साचले होते. पेडर रोड, महालक्ष्मी मंदिर आणि ताडदेव परीसरात दिड फूट पाणी साचले होते. यामुळे रस्ते वाहतूक बंद होती. रेल्वे सेवा पुरती कोलमडली होती त्यामुळे अनेकांनी लांबच्या प्रवासाकरिता अ‍ॅप बेस्ड कॅब सेवा वापरण्याचा निर्णय घेतला. पण परिस्थितीचा गैरफायदा घेत कॅबवाल्याने थेट दिड ते अडीच हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले.


एरव्ही बक्कळ नफा कमवणाऱ्या ॲप आधारित कॅब सेवांनी किमान नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ना नफा ना तोटा दरात सेवा द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. वाजवी दरापेक्षा अधिक पैसे आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर सरकारनेच नियमावली करुन कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली.


Comments
Add Comment

किंग्स सर्कलजवळ 'बेस्ट'च्या मीटर बॉक्सला आग!

मुंबई: किंग्स सर्कल येथे अमृत हॉटेलजवळ रविवारी 'बेस्ट'च्या लाल रंगाच्या मीटर बॉक्सला अचानक आग लागली. शॉर्ट

‘मुलुंडमध्ये’ अजगराने उडवली धांदल!

मुंबई: मुलुंडमधील एका निवासी सोसायटीमध्ये मंगळवारी १० फूट लांबीचा भारतीय अजगर (Indian Rock Python) दिसल्याने परिसरात भीतीचे

कल्याणमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी: ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेत आज मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना (शिंदे गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जैन पर्वासाठी दोन दिवस कत्तलखाने बंद!

मुंबई: जैन पर्व पर्युषण पर्वाच्या काळात दोन दिवसांसाठी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय 'बीएमसी'ने घेतला आहे, असे

Best Cooprative Bank Election : मुंबईकरांचा कौल ठाम! "मुंबईत ड्युप्लिकेट ब्रँडला नाही थारा", बेस्टच्या रणांगणात भाजपाचा दावा

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव

भांडुपमध्ये पावसात घडली धक्कादायक घटना, हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्याचाबाबत घडली दुर्दैवी घटना

मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना भांडुपमध्ये धक्कादायक घटना घडली. हा प्रकार भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड