Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केला. ज्यात सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून, शुभमन गिल उपकर्णधार म्हणून भारताच्या टी २० टीमची कमान सांभाळेल.  बीसीसीआयने जाहीर केलेल्या आशिया कप २०२५ साठीच्या टीमध्ये कोणकोणत्या खेळाडूंचा स्थान मिळाले आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया आणि निवड समिती यांच्यातील बैठकीनंतर आशिया कप २०२५ साठी निर्णायक संघ जाहीर करण्यात आला. आयपीएलमधील काही सिद्ध कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना यंदा दुर्लक्षित करण्यात आल्याचे दिसते, तर कमी प्रभावी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये शुभमन गिलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर जसप्रीत बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वालला संघात स्थान मिळू शकलेले नाही.


आयपीएल २०२५ मध्ये अय्यरने ६०४ धावा केल्या होत्या तर जयस्वालने ५५९ धावा केल्या होत्या. या दोघांची एकत्रितपणे, एकूण संख्या ११६३ पेक्षा जास्त होती. रिंकू सिंगने आयपीएल हंगामात खराब कामगिरी असूनही संघात स्थान मिळवले आहे. मात्र जयस्वालचा पाच राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.



आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाचा संघ: 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षितराणा, रिंकू सिंग.



आशिया कप २०२५ बद्दल 


यावर्षीचा आशिया कप ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान अबू धाबी आणि दुबई येथे खेळला जाणार आहे. तसेच यावेळी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात असेल. विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच आशिया कपच्या इतिहासात आठ संघांचा समावेश करण्यात आला आहे. या आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. आधी लीग स्टेज सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ ३ सामने होतील.  त्यानंतर अंतिम ४ ची फेरी होईल. यातील अव्वल संघांमध्ये २८ सप्टेंबर रोजी विजेतेपदाचा सामना खेळला जाईल.



आशिया कपमध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक


भारतीय संघाला आशिया कपच्या गट अ मध्ये पाकिस्तान, ओमान आणि युएईसह स्थान देण्यात आले आहे. तर गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी दुबईमध्ये युएई विरुद्ध खेळेल. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पाकिस्तान विरुद्ध होईल. भारतीय संघ आपला शेवटचा गट सामना १९ सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये ओमान विरुद्ध खेळेल. आशिया कप दोन्ही गटातील टॉप-२ संघ सुपर-४ टप्प्यात पोहोचतील. त्यानंतर सुपर-४ टप्प्यातील टॉप २ संघांमध्ये जेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

Comments
Add Comment

Indian Team Schedule : जुलै महिन्यात भारतीय संघ किती सामने खेळणार ? जाणून घ्या संपू्र्ण वेळपत्रक; इंग्लंडमध्ये किती सामने होणार ?

मुंबई : भारतीय संघ पुढच्या महिन्यात (जुलै) इंग्लंच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन दिग्गज पुनरागमन करणार

Vaibhav Sooryvanshi : आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास ! रोहित- हार्दिकचा विक्रम मोडणार ?

Mumbai: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज (२६ जून) पासून दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रेलियाची बाद फेरीत धडक; पॅराग्वेच्याही आगेकूचची शक्यता

सँटा क्लारा, कॅलिफोर्निया : ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे यांच्यातील सामना गोलशून्य (०-०) बरोबरीत सुटल्यामुळे 'सॉकरूस'

FIFA WORLDCUP 2026 : जपान आणि स्वीडनची बाद फेरीत धडक; सामना १-१ ने अनिर्णित

अर्लिंग्टन, टेक्सास : जपान आणि स्वीडन यांच्यातील अटीतटीचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला असला तरी, या निकालासह

FIFA WORLDCUP 2026 : डच संघाचा दणदणीत विजय; ट्युनिशियाला नमवून विश्वचषकाच्या बाद फेरीत अव्वल स्थान

कॅन्सस सिटी, मिसूरी: पावसाळी हवामान आणि विजांच्या कडकडाटाच्या व्यत्ययानंतरही नेदरलँड्सने ट्युनिशियावर ३-१ असा

FIFA WORLDCUP 2026 : इक्वेडोरची ऐतिहासिक कामगिरी; जर्मनीवर मात करत विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक

ईस्ट रदरफोर्ड, एनजे : गोंझालो प्लाटाच्या निर्णायक गोलच्या जोरावर इक्वेडोरने बलाढ्य जर्मनीवर २-१ ने विजय मिळवत