सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी मुख्यमंत्र्‍यांनी केले हे ट्वीट

मुंबई: चेंबूर ते भक्तीपार्कदरम्यान बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांची थरारकपणे सुटका केली जात आहे. काही तांत्रिक कारणामुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ मोनोरेल अडकून पडली. बंद पडलेल्या मोनोमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना त्रास होऊ लागला.


क्रेनच्या सहाय्याने या प्रवाशांची सुटका केली जात आहे. तरी आणखी काही काळ सुटकेसाठी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला आधी प्राधान्य द्या अशा प्रकारच्या सूचना मु्ख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.


काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल. असे मुख्यमंत्र्‍यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.





दुसरीकडे उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोनोरेलमधील प्रवाशांना सरळ संपर्क साधत काळजी करू नका असे सांगितले. आम्ही सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तुम्हाला काहीच होणार नाही अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण