सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी मुख्यमंत्र्‍यांनी केले हे ट्वीट

मुंबई: चेंबूर ते भक्तीपार्कदरम्यान बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांची थरारकपणे सुटका केली जात आहे. काही तांत्रिक कारणामुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ मोनोरेल अडकून पडली. बंद पडलेल्या मोनोमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना त्रास होऊ लागला.


क्रेनच्या सहाय्याने या प्रवाशांची सुटका केली जात आहे. तरी आणखी काही काळ सुटकेसाठी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला आधी प्राधान्य द्या अशा प्रकारच्या सूचना मु्ख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.


काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे. एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्याठिकाणी पोहोचल्या आहेत. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुणीही काळजी करु नये, घाबरून जाऊ नये. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येईल. सर्वांनी संयम ठेवावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. मी एमएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे. हा प्रकार का घडला, याचीही चौकशी करण्यात येईल. असे मुख्यमंत्र्‍यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.





दुसरीकडे उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोनोरेलमधील प्रवाशांना सरळ संपर्क साधत काळजी करू नका असे सांगितले. आम्ही सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तुम्हाला काहीच होणार नाही अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

गणेशोत्सव काळात एसटीला बाप्पा पावला

१ कोटी ८० लाखांचे उत्पन्न; ३१,५४६ प्रवाशांचा प्रवास पालघर(प्रतिनिधी) : पालघर एसटी विभागाच्या माध्यमातून

‘ओसी’ नसलेल्या इमारतीसुद्धा रडारवर

बांधकाम परवानग्यांचे संकलन सुरू विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार पालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती उभ्या करून,

आता शनिवारी-रविवारीही महापालिकेत होणार विवाह नोंदणी

सोमवार ते शुक्रवारमध्ये दररोज ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ मुंबई (खास प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वजनिक

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

महापालिकेचा रेबीजमुक्त मुंबईसाठी पुढाकार

भटक्या श्वानांचे लसीकरण २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई (खास प्रतिनिधी) : श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज

मुंबईतील ५७४ रस्त्यांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होणार

अर्धवट कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन रस्त्यांची कामे सुरू होणार मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने