मुंबई मोनोरेल बिघाड: क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे सेवा ठप्प, प्रवाशांचा जीव धोक्यात

मुंबई: मुंबईतील मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांनी मोनोरेलकडे धाव घेतली, मात्र क्षमतेपेक्षा जास्त गर्दीमुळे आज मोनोरेलची सेवाही ठप्प झाली. भक्ति पार्क ते चेंबूरदरम्यान धावणारी RST-4 ही मोनोरेल मैसूर कॉलनी स्टेशनजवळ अचानक थांबली, कारण तिच्या मूळ क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला.


प्राथमिक तपासणीनुसार, मोनोरेलची मूळ क्षमता १०४ टन असताना, आजच्या प्रचंड गर्दीमुळे तिचे वजन सुमारे १०९ मेट्रिक टन झाले होते. या अतिरिक्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टरमधील संपर्क तुटला आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळेच ही मोनोरेल जागेवर थांबली.


एमएमआरडीएने तातडीने तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी पाठवली आणि दुसऱ्या मोनोरेलने तिला खेचून स्टेशनपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिरिक्त वजनामुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य करावे लागले.



आज हार्बर लाईनवरील लोकल सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी मोनोरेल स्थानकांवर झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही गर्दी नियंत्रणात आली नाही, कारण प्रवाशांची संख्या खूप वाढली होती.


एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, मोनोरेलची रचना मर्यादित क्षमतेसाठी आहे आणि ती लोकल किंवा मेट्रोसारख्या मोठ्या गर्दीचे वहन करण्यासाठी तयार केलेली नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी सुरक्षा आणि तांत्रिक पथकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.


सध्या एमएमआरडीए, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या समन्वयाने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची सखोल तांत्रिक तपासणी केली जात असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असेही एमएमआरडीएने सांगितले.

Comments
Add Comment

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५