Narendra Modi : भारताचं दमदार प्रत्युत्तर! अमेरिका-चीनची चिंता वाढणार, टॅरिफनंतरही अर्थव्यवस्थेत दिलासादायक गुडन्यूज

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा पुढे करत अमेरिकेने आणखी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकूण ५० टक्के टॅरिफ भारतीय वस्तूंवर लागू होणार आहे. हा नवा टॅरिफ येत्या २८ ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या सर्व अंदाजांना धक्का देणारी आणि वेगळे चित्र दाखवणारी माहिती आता समोर आली आहे.

“भारताचा बेरोजगारी दर घसरला; जुलै महिन्यात ५.२% वर”


जुलै महिन्यात भारताच्या बेरोजगारी दरात लक्षणीय घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. देशाचा बेरोजगारी दर ५.६ टक्क्यांवरून कमी होऊन ५.२ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण भागातील स्थिती पाहता, १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांचा बेरोजगारी दर ४.९ टक्क्यांवरून घसरून ४.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. या घटेमागे मुख्य कारण म्हणून ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे शेतामध्ये सुरू असलेली कामे दिली जात आहेत. दरवर्षीप्रमाणेच पावसाळा आणि हिवाळ्यात शेतीसंबंधित कामांमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्राला गती मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


"शहरी बेरोजगारीत किंचित वाढ, तरीही देशाचा बेरोजगारी दर ५.२% वर”


भारतातील बेरोजगारीच्या आकडेवारीत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वेगवेगळे चित्र दिसून येत आहे. शहरी भागात बेरोजगारी दरात किंचित वाढ झाली आहे. जून महिन्यात शहरी बेरोजगारी दर ७.१ टक्के होता, तो जुलै महिन्यात वाढून ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तथापि, ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींमुळे एकूण राष्ट्रीय बेरोजगारी दर घटला आहे. सरासरी पाहता, भारताचा बेरोजगारी दर ५.६ टक्क्यांवरून कमी होऊन ५.२ टक्क्यांवर आला आहे. या घटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जीएसटी सुधारणा; रोजगारवाढीची शक्यता


भारतातील अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. केंद्र सरकारकडून नुकतंच जीएसटीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा (GST Reform) करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या सुधारणा अमलात आल्यास देशातील व्यापाराला चालना मिळेल आणि विविध क्षेत्रांमध्ये नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, बेरोजगारी दर आणखी खाली येऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, जीएसटी रिफॉर्मच्या निर्णयामुळे या चिंतेवर काही प्रमाणात पाणी फिरल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात रोजगार वाढून बेरोजगारी दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

Heavy Rains Hit Punjab : पाऊस-पूर-भूस्खलनाची तिहेरी संकटे; भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प, २३ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश,