मुंबईत १८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

  33

मुंबई : मुंबईतील पूर्व उपनगरातील गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यावरील (GMLR) पुलाच्या कामामुळे बाधित होणारी १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे १८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी स. १० वाजेपासून ते शुक्रवार, २२ ऑगस्टपर्यंत पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण १८ तास ‘टी’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ‘टी’ विभागातील नागरिकांनी पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.


गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यालगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर मुलुंड (पश्चिम), जवाहरलाल नेहरु मार्ग, देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुर गाव, इत्यादी. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याचे कार्य सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीमंत रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा संपन्न मुंबई: इतिहासाशी नवीन पिढीला

देवनार पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू!

मुंबई: देवनार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा आत्माराम जोशी (५७) यांचा १७ ऑगस्ट रोजी

मुंबई, ठाण्यात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; मंगळवारी शाळांना सुट्ट्या जाहीर

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई मनपांसह पालघर व बुलढाण्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी मुंबई : सलग तिसऱ्या

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात (State Disaster Management Cell)

मुंबईत पावसाची धुमश्चक्री, मेट्रो ठरली तारणहार!

मुंबई: सोमवारी शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना, ज्यामुळे रस्ते नद्यांसारखे झाले आणि प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प

विमान प्रवासावर पावसाचा परिणाम!

मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी, सततच्या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज