मुलुंडकरांनो गुरुवारी पाणी जपून वापरा, १८ तास पाणीबाणी

  29

मुंबई : मुलुंडमधील काही भागांत गुरुवार २१ ऑगस्ट रोजी १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील (जीएमएलआर) पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. एक जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे टी वॉर्ड या मुलुंड वॉर्डमध्ये ‘मॅरेथॉन मॅक्सिमा’ इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळविण्यात येणार आहे. ही जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट २०२५ ला सकाळी १० वाजल्यापासून ते २२ ऑगस्टला पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागाचा पाणीपुरवठा अठरा तास बंद राहणार आहे. यामुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता आणि लगतचा परिसर, मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, जवाहरलाल नेहरू मार्ग (जे. एन. रोड), देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस.एन.मार्ग, आर.एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी.मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल.मार्ग, नाहुर गाव या भागात पाणीपुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी साठवून आणि जपून वापरावे तसेच नवीन पाइपलाइनमधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर किमान ५ दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Comments
Add Comment

इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याचे कार्य सुरू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीमंत रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा संपन्न मुंबई: इतिहासाशी नवीन पिढीला

देवनार पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू!

मुंबई: देवनार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा आत्माराम जोशी (५७) यांचा १७ ऑगस्ट रोजी

मुंबई, ठाण्यात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; मंगळवारी शाळांना सुट्ट्या जाहीर

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई मनपांसह पालघर व बुलढाण्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी मुंबई : सलग तिसऱ्या

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात (State Disaster Management Cell)

मुंबईत पावसाची धुमश्चक्री, मेट्रो ठरली तारणहार!

मुंबई: सोमवारी शहरात मुसळधार पाऊस सुरू असताना, ज्यामुळे रस्ते नद्यांसारखे झाले आणि प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प

विमान प्रवासावर पावसाचा परिणाम!

मुंबई: सलग तिसऱ्या दिवशी, सततच्या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज