मुलुंडकरांनो गुरुवारी पाणी जपून वापरा, १८ तास पाणीबाणी

मुंबई : मुलुंडमधील काही भागांत गुरुवार २१ ऑगस्ट रोजी १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील (जीएमएलआर) पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. एक जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे टी वॉर्ड या मुलुंड वॉर्डमध्ये ‘मॅरेथॉन मॅक्सिमा’ इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळविण्यात येणार आहे. ही जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट २०२५ ला सकाळी १० वाजल्यापासून ते २२ ऑगस्टला पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागाचा पाणीपुरवठा अठरा तास बंद राहणार आहे. यामुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता आणि लगतचा परिसर, मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, जवाहरलाल नेहरू मार्ग (जे. एन. रोड), देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस.एन.मार्ग, आर.एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी.मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल.मार्ग, नाहुर गाव या भागात पाणीपुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी साठवून आणि जपून वापरावे तसेच नवीन पाइपलाइनमधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर किमान ५ दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)