मुलुंडकरांनो गुरुवारी पाणी जपून वापरा, १८ तास पाणीबाणी

मुंबई : मुलुंडमधील काही भागांत गुरुवार २१ ऑगस्ट रोजी १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील (जीएमएलआर) पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. एक जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील पुलाच्या कामामुळे एक हजार २०० मिलिमिटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे टी वॉर्ड या मुलुंड वॉर्डमध्ये ‘मॅरेथॉन मॅक्सिमा’ इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळविण्यात येणार आहे. ही जलवाहिनी दोन ठिकाणी जोडण्याचे काम २१ ऑगस्ट २०२५ ला सकाळी १० वाजल्यापासून ते २२ ऑगस्टला पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामकाजादरम्यान टी वॉर्डमधील काही भागाचा पाणीपुरवठा अठरा तास बंद राहणार आहे. यामुळे गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता आणि लगतचा परिसर, मुलुंड (पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, जवाहरलाल नेहरू मार्ग (जे. एन. रोड), देवीदयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड), डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस.एन.मार्ग, आर.एच. बी. मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्ही. पी.मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल.मार्ग, नाहुर गाव या भागात पाणीपुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी साठवून आणि जपून वापरावे तसेच नवीन पाइपलाइनमधून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर किमान ५ दिवस पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल