तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  61

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण प्रशासनाने ३ दरवाजे उघडले असून सुमारे ३३१५.७८ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.


तानसा धरण पूर्ण भरले असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्ग करणे आवश्यक झाले आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.धरणाखालच्या बाजूस असलेल्या तानसा नदीलगतच्या तसेच आसपासच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात किंवा किनारी भागात जाऊ नये. पशुधन व इतर मालमत्ता सुरक्षित स्थळी हलवावीत.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.स्थानिक महसूल व पोलीस यंत्रणांसह ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले असून संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक खबरदारीचे उपाय सुरु करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली आहे.प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, अफवा न पसरवण्याचे व प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना