भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे . ज्यात स्पायडरमॅन हातात वायपर घेऊन रस्त्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आहे .


मुंबईत गेल्या तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे . ज्यामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली आहे . अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे . रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे . सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे . भिवंडी शहरातील भाजी मार्केट, तीन बत्ती नाका परिसरात पावसामुळे पाणी साचत असते . यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्याशिवाय पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुकानदारांचे नुकसान होते. यामुळे भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने यावर ठोस उपाययोजना करून यातून नागरिकांची आणि भिवंडीकरांची या समस्येतून कायमची सुटका करावी यासाठी भिवंडीच्या मुख्य बाजारपेठेत पावसामुळे साचलेल्या पावसाचा पाण्याचा निचरा करण्यासाठी चक्क स्पायडरमॅन उतरून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करताना दिसला.


तसेच , भिवंडी ठाणे या जुन्या रस्त्यावर अंजुर फाटा, राहनाळ,पूर्णा, काल्हेर, कशेळी या मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. राहनाळ गावाच्या हद्दीत होलीमेरी शाळा परिसरातील रस्त्यावर सुमारे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे. ज्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली असून अनेक वाहने रस्त्यात बंद पडली आहेत . या मार्गावरील पाणी निचरा होणाऱ्या गटारांची स्वच्छता न केल्याने ही समस्या उद्भवली आहे. ज्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे .

Comments
Add Comment

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट