भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

  22

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे . ज्यात स्पायडरमॅन हातात वायपर घेऊन रस्त्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आहे .


मुंबईत गेल्या तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे . ज्यामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली आहे . अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे . रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे . सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे . भिवंडी शहरातील भाजी मार्केट, तीन बत्ती नाका परिसरात पावसामुळे पाणी साचत असते . यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्याशिवाय पावसाच्या पाण्यामुळे अनेक दुकानदारांचे नुकसान होते. यामुळे भिवंडी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने यावर ठोस उपाययोजना करून यातून नागरिकांची आणि भिवंडीकरांची या समस्येतून कायमची सुटका करावी यासाठी भिवंडीच्या मुख्य बाजारपेठेत पावसामुळे साचलेल्या पावसाचा पाण्याचा निचरा करण्यासाठी चक्क स्पायडरमॅन उतरून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करताना दिसला.


तसेच , भिवंडी ठाणे या जुन्या रस्त्यावर अंजुर फाटा, राहनाळ,पूर्णा, काल्हेर, कशेळी या मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. राहनाळ गावाच्या हद्दीत होलीमेरी शाळा परिसरातील रस्त्यावर सुमारे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे. ज्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली असून अनेक वाहने रस्त्यात बंद पडली आहेत . या मार्गावरील पाणी निचरा होणाऱ्या गटारांची स्वच्छता न केल्याने ही समस्या उद्भवली आहे. ज्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे .

Comments
Add Comment

रणवीर सिंगच्या 'धुरंधर'च्या सेटवर मोठी दुर्घटना, १२० क्रू सदस्य पडले आजारी

लेह: अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी 'धुरंधर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक धक्कादायक घटना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

फास्टॅग वार्षिक पासला देशभरातून प्रचंड प्रतिसाद, चार दिवसांत तब्बल इतक्या लोकांनी केला बुक

नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकत्याच सुरू केलेल्या फास्टॅग

श्रीगोंद्यात महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

श्रीगोंदा : सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथील मिनाक्षी रामदास सकट (वय ३८ ) यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या तानसा धरणाचे पाणी पातळी पूर्ण क्षमतेला पोहोचल्यामुळे आज

देवनार पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू!

मुंबई: देवनार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्णा आत्माराम जोशी (५७) यांचा १७ ऑगस्ट रोजी