कल्याणमध्ये कचराकुंडीजवळ नवजात अर्भक

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बारावे गाव शिवमंदिर रस्त्यालगत नवजात स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले आहे. मानवतेला कळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यातून माहिती मिळाल्यानंतर रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रशासनाने हे अर्भक ताब्यात घेतले आहे.
या बालकाची प्रकृती स्थिर आहे. हे बालक बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांनी माध्यमांना सांगितले.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण प. येथील बारावे गाव शिवमंदिर रस्ता परिसरात कचराकुंडी जवळ हे बाळ आढळले.
बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावले, ग्रामस्थांनी यासंदर्भात खडकपाडा पोलीसांना माहिती दिली, पोलिसांनी यासंदर्भात मनपा आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता डॉ. समीर सरवणकर यांनी परिचारिका आणि मदतनीस माध्यमातून वसंत व्हाली येथील सुतिका गृहात बाळाला आणित देखरेख सुरू केली असल्याचे प्रसिद्धी माध्यमा़ना सरवणकर यांनी सांगितले. तर पोलिसांनी निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके सक्रिय, केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून
प्राप्त झाली आहे.

Comments
Add Comment

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना

Mumbai Nasik Highway Accident: देवदर्शनानंतर घरी परतणाऱ्या बाप लेकीवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी येथील

ठाणे तहसीलदार कार्यालयात घडलं काय ? फेसबुक पोस्ट झाली व्हायरल, पोलिसांत तक्रार दाखल

ठाणे : ठाणे तहसीलदार कार्यालयामध्ये देवीदेवतांची पूजा करण्यात आल्याचा आणि नंतर ती पूजेचे सर्व साहित्य तिथून

Lift Collapse: कल्याणमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्टचा अपघात, आठ जणांपैकी चारजण गंभीर जखमी, तर दोघांचे पाय...

कल्याण: महाराष्ट्रातील कल्याण पश्चिम येथील रॉयस बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्ट पडल्याने मोठी

ठाण्यात ८० हजार कुटुंबांचे धोकादायक इमारतींत वास्तव्य

इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशांचा विरोध ठाणे : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची