युपीआय व्यवहारात महाराष्ट्रच नंबर वन !

प्रतिनिधी: युपीआय व्यवहारातील मूल्यांकनात व व्यवहारातही मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र युपीआय व्यवहारात प्रथम क्रमांकाणे राज्य ठरले आहे. एसबीआयकडून प्रसिद्ध झालेल्या अहवाला त हे निरिक्षण नोंदवले गेले आहे. एनपीसीआयने (National Payments Corporation of India NPCI) डेटानुसार, महाराष्ट्राचा शेअर जुलै महिन्यात ९.८% होता त्याखालोखाल, कर्नाटक (५. ५%), उत्तर प्रदेश (५.३%) राज्याचा क्रमांक लागला आहे. भारतातील संपूर्ण कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी भारत वेगाने पुढे जात असल्याचे म्हटले जात आहे. ऑगस्टपर्यंत युपीआय व्यवहार ९०४४६ कोटींवर पोहोचले आहेत. त्यामुळे भारताने ९० हजार कोटींचा टप्पा पार केल्याने भारतीय डिजिटल इकोसिस्टीमला आता आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, जानेवारी त व्यवहारांची संख्या ७५७४३ कोटी रुपये होती ती जुलैत ८०९१९ कोटी झाली. आता ती ९०४४६ कोटीवर पोहोचली आहे.

यापूर्वीही आयएमएफ (IMF) अहवालात माहितीनुसार भारताच्या युपीआय व्यवहारात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते. एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याला युपीआयमध्ये १८ ० अब्ज रूपयांचा व्यवहार देशात होत आहेत.तर दररोज ६८ कोटी व्यवहार युपीआयमधून होत आहेत.यातूनच ही होत असलेली वाढ मोठी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. एसबीआयच्या अहवालातील अधिक माहितीनुसार, यूपीआय इकोसिस्टमला चालना देणाऱ्या आघाडीच्या बँकांबद्दलही माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ५.२ अब्ज व्यवहार हाताळत अव्वल प्रे षक सदस्य (Highest Remitter) म्हणून उदयास आली आहे.

पहिल्यांदाच, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांवरील राज्यवार डेटा जारी केला आहे, ज्यामुळे प्रादेशिक अवलंबनाचे स्पष्ट चित्र समोर आले.
Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा