युपीआय व्यवहारात महाराष्ट्रच नंबर वन !

प्रतिनिधी: युपीआय व्यवहारातील मूल्यांकनात व व्यवहारातही मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र युपीआय व्यवहारात प्रथम क्रमांकाणे राज्य ठरले आहे. एसबीआयकडून प्रसिद्ध झालेल्या अहवाला त हे निरिक्षण नोंदवले गेले आहे. एनपीसीआयने (National Payments Corporation of India NPCI) डेटानुसार, महाराष्ट्राचा शेअर जुलै महिन्यात ९.८% होता त्याखालोखाल, कर्नाटक (५. ५%), उत्तर प्रदेश (५.३%) राज्याचा क्रमांक लागला आहे. भारतातील संपूर्ण कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी भारत वेगाने पुढे जात असल्याचे म्हटले जात आहे. ऑगस्टपर्यंत युपीआय व्यवहार ९०४४६ कोटींवर पोहोचले आहेत. त्यामुळे भारताने ९० हजार कोटींचा टप्पा पार केल्याने भारतीय डिजिटल इकोसिस्टीमला आता आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, जानेवारी त व्यवहारांची संख्या ७५७४३ कोटी रुपये होती ती जुलैत ८०९१९ कोटी झाली. आता ती ९०४४६ कोटीवर पोहोचली आहे.

यापूर्वीही आयएमएफ (IMF) अहवालात माहितीनुसार भारताच्या युपीआय व्यवहारात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते. एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याला युपीआयमध्ये १८ ० अब्ज रूपयांचा व्यवहार देशात होत आहेत.तर दररोज ६८ कोटी व्यवहार युपीआयमधून होत आहेत.यातूनच ही होत असलेली वाढ मोठी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. एसबीआयच्या अहवालातील अधिक माहितीनुसार, यूपीआय इकोसिस्टमला चालना देणाऱ्या आघाडीच्या बँकांबद्दलही माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ५.२ अब्ज व्यवहार हाताळत अव्वल प्रे षक सदस्य (Highest Remitter) म्हणून उदयास आली आहे.

पहिल्यांदाच, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांवरील राज्यवार डेटा जारी केला आहे, ज्यामुळे प्रादेशिक अवलंबनाचे स्पष्ट चित्र समोर आले.
Comments
Add Comment

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

काठमांडू : आधी सोशल मीडिया बंदी विरोधात रस्त्यावर आलेल्या तरुणाईने नंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हिंसक

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव

‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित

मुंबई : "शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा, दुबईला पळून जाण्याची शक्यता

काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी

गणेशोत्सवानंतर पावसाची विश्रांती, पण या दिवसापासून जोर वाढणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ही विश्रांती काही दिवसांपुरतीच मर्यादीत आहे. पावसाचा जोर

जीएसटी कपात झाली आता सरकारकडून व्यापारांसाठी महत्वाचा निर्णय

प्रतिनिधी: आता जीएसटी कपातीनंतर जुन्या वस्तूंचा साठा (Goods Stocks) नव्या एमआरपी (Maximum Retail Price MRP) सह विकता येणार आहे. सरकार यावर