गेटवे ते मांडवा फेरीबोट १ सप्टेंबरपासून सुरू

मुंबई :  तीन महिन्यांच्या बंदीनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी अलिबाग-मुरुडमधील चाकरमान्यांचा हा सर्वात आवडीचा मार्ग असला तरी यंदा गणेश चतुर्थीला येणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही; मात्र परतीचा प्रवास फेरीबोटीने सुखरूप करता येणार आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण कमी होऊन फेरीबोट निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होईल, असा अंदाज जलवाहतूक संस्थांचा आहे.


मॉन्सून सुरू होण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंतची फेरीबोटसेवा बंद होती. मेरिटाइम बोर्डाने १ सप्टेंबरपासून या मार्गावरील फेरीबोट सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार अजंठा, मालदार, पीएनपी या वाहतूक संस्थांनी आपल्या फेरीबोटी सज्ज ठेवल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी फेरीबोटीचा वापर करता येणार आहे. १ सप्टेंबरपासून फेरीबोट सुरू झाल्यानंतर गौरी विसर्जन झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखरूपपणे करता येणार आहे.


याचे नियोजन आतापासूनच अनेकजण करू लागले आहेत. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. १ सप्टेंबरपासून जलवाहतूक वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न फेरीबोट संस्थांचा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साधारणपणे २६ जूनपासून दरवर्षी फेरीबोटसेवा बंद केली जाते; मात्र यादरम्यान आकाराने मोठी असलेली रो-रो बोट सुरू असते. नारळी पौर्णिमेनंतरही अनेकवेळा समुद्र शांत झालेला नसतो. त्यामुळे ही सेवा थेट सप्टेंबरमध्ये सुरू केली जाते, अशी माहिती पीएनपी मेरिटाइम सर्व्हिसेसचे व्यवस्थापक संजय भोपी यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरिटाइम बोर्डाने कडक धोरण अवलंबणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)