त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांची दर्शन घेताना गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा देवस्थानच्यावतीने केला जातो. परंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका भाविकांना बसत आहे. दर्शन व्यवस्थेत अकस्मात बदल केल्यामुळे उद्भवलेल्या वादात सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केली. तिथे पोलीस होते. या घटनेच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या.


त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवार, महाशिवरात्र याशिवाय आठवड्याचे शनिवार, रविवार, काही वेळा सुट्टी असल्यावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. या उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात केला जातो. मधल्या काळात देवस्थानने ऑनलाईन देणगी दर्शनाची व्यवस्था केली. मात्र, या व्यवस्थेत आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले. या प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत देवस्थानच्या ऑनलाईन देणगी दर्शन पध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालत देवस्थानला काही सूचना केल्या होत्या.


श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसूचना न देता दर्शन व्यवस्थेत बदल केल्याने वाद उदभवला. यावेळी देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे उपस्थित भाविकांना धक्का बसला. दर्शनासाठी आलेले काही जण दर्शन न घेताच माघारी परतले.


सुरक्षारक्षकांच्या अरेरावीचा फटका अनेकदा भाविकांना बसतो. बाहेरगावहून येणारे भाविक अनेकदा तक्रार न करता माघारी निघून जातात. कोणी तसा प्रयत्न केला तर, तक्रार घेतली जात नसल्याच्या तक्रारी यापूर्वी झालेल्या आहे.



त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाही तर छळाचे ठिकाण


त्र्यंबकेश्वर मंदिर बाबत सातत्याने तक्रारींची मालिका संपायचं नाव घेत नाहीये. यापूर्वी त्रंबकेश्वर मंदिरामध्ये साध्या भाविकाला दर्शन घेण्यासाठी म्हणून तासनतास रांगेत उभे राहावे लागते. परंतु हे सर्व घडत असताना देवस्थान प्रतिष्ठान जिल्हा प्रशासन आणि इतर कोणतीही संस्था यावर काहीही बोलण्यास तयार नाही. इतर वेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात साधी टाचणी जरी पडली. तर, त्यावरून गदारोळ करणाऱ्यांनी सुद्धा या सर्व विषयावर शांत राहनेच पसंत केले आहे.


एकूणच त्र्यंबकेश्वर मंदिराची बिघडलेली परिस्थिती आणि त्यामुळे या परिसरामध्ये नागरिक येऊन देखील दर्शन न होणे त्यामुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेबरोबरच पर्यटन व्यवस्थेला देखील मोठा फटका बसू लागला आहे. पण याकडे कोणीही बघण्यास तयार नाही हे मोठे दुर्दैव आहे.


आत्तापर्यंत बघितलं तर त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले तरी या ठिकाणी भाविकांचा मोठा छळ होत असतो याची अनेक उदाहरणं आहेत. भाविक आपले दर्शन न घेता त्र्यंबकेश्वर राजाची माफी मागत लांबूनच दर्शन घेत निघून जातात यासारखे त्र्यंबकेश्वर व नाशिक जिल्ह्याचे दुर्दैवं म्हणावे लागेल.

Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या