त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांची दर्शन घेताना गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा देवस्थानच्यावतीने केला जातो. परंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका भाविकांना बसत आहे. दर्शन व्यवस्थेत अकस्मात बदल केल्यामुळे उद्भवलेल्या वादात सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केली. तिथे पोलीस होते. या घटनेच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या.


त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवार, महाशिवरात्र याशिवाय आठवड्याचे शनिवार, रविवार, काही वेळा सुट्टी असल्यावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. या उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात केला जातो. मधल्या काळात देवस्थानने ऑनलाईन देणगी दर्शनाची व्यवस्था केली. मात्र, या व्यवस्थेत आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले. या प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत देवस्थानच्या ऑनलाईन देणगी दर्शन पध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालत देवस्थानला काही सूचना केल्या होत्या.


श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसूचना न देता दर्शन व्यवस्थेत बदल केल्याने वाद उदभवला. यावेळी देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे उपस्थित भाविकांना धक्का बसला. दर्शनासाठी आलेले काही जण दर्शन न घेताच माघारी परतले.


सुरक्षारक्षकांच्या अरेरावीचा फटका अनेकदा भाविकांना बसतो. बाहेरगावहून येणारे भाविक अनेकदा तक्रार न करता माघारी निघून जातात. कोणी तसा प्रयत्न केला तर, तक्रार घेतली जात नसल्याच्या तक्रारी यापूर्वी झालेल्या आहे.



त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाही तर छळाचे ठिकाण


त्र्यंबकेश्वर मंदिर बाबत सातत्याने तक्रारींची मालिका संपायचं नाव घेत नाहीये. यापूर्वी त्रंबकेश्वर मंदिरामध्ये साध्या भाविकाला दर्शन घेण्यासाठी म्हणून तासनतास रांगेत उभे राहावे लागते. परंतु हे सर्व घडत असताना देवस्थान प्रतिष्ठान जिल्हा प्रशासन आणि इतर कोणतीही संस्था यावर काहीही बोलण्यास तयार नाही. इतर वेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात साधी टाचणी जरी पडली. तर, त्यावरून गदारोळ करणाऱ्यांनी सुद्धा या सर्व विषयावर शांत राहनेच पसंत केले आहे.


एकूणच त्र्यंबकेश्वर मंदिराची बिघडलेली परिस्थिती आणि त्यामुळे या परिसरामध्ये नागरिक येऊन देखील दर्शन न होणे त्यामुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेबरोबरच पर्यटन व्यवस्थेला देखील मोठा फटका बसू लागला आहे. पण याकडे कोणीही बघण्यास तयार नाही हे मोठे दुर्दैव आहे.


आत्तापर्यंत बघितलं तर त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले तरी या ठिकाणी भाविकांचा मोठा छळ होत असतो याची अनेक उदाहरणं आहेत. भाविक आपले दर्शन न घेता त्र्यंबकेश्वर राजाची माफी मागत लांबूनच दर्शन घेत निघून जातात यासारखे त्र्यंबकेश्वर व नाशिक जिल्ह्याचे दुर्दैवं म्हणावे लागेल.

Comments
Add Comment

Heatwave : उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन

नवी दिल्ली : दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

वजन वाढणे किंवा वजन कमी होणे या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !

सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टिला एक वेगळी दिशा मिळाली. जगभरात १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा पहिला

Ranveer singh :धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वरील बंदी प्रकरणी FWICE चा खुलासा

मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nashik : शाळेत प्रवेश द्या; मी अंध आहे, ही माझी चूक आहे का? प्रवेशासाठी अंध विद्यार्थ्याचे आर्त आवाहन

नाशिक : “मी अंध आहे, ही माझी चूक आहे का? मला शिकण्याचा अधिकार नाही का?” असा हृदय पिळवटून टाकणारा सवाल एका गरीब अंध