विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, अवघ्या २९ दिवसांत दोन घटना

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शारदा विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. अवघ्या २९ दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पहिली घटना १८ जुलै रोजी घडली, जेव्हा बीडीएसच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी ज्योती जांगरा हिने आत्महत्या केली. यानंतर आता १६ ऑगस्ट रोजी, बी.टेकचा विद्यार्थी शिवम कुमारने त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतला. अवघ्या २९ दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ज्योती आणि शिवम दोघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्योतीने विद्यापीठाच्या दोन प्राध्यापकांवर मानसिक छळ आणि अपमानाचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांची नावे नोंदवली होती. यासोबतच, दोन प्राध्यापकांनाही अटक केली.

शुक्रवारी रात्री १८ जुलै रोजी ज्योतीचा मृतदेह तिच्या वसतिगृहाच्या खोलीत आढळला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी ज्योतीचा मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि दोन डायरी तसेच आत्महत्या करण्याआधी लिहिलेली चिठ्ठी हे सर्व जप्त केले. ज्योतीचे कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडियावरील संभाषण देखील तपासण्यात आली.

महिंदर सर आणि शेरी मॅमच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे ज्योतीने चिठ्ठीत लिहिले होते. ज्योतीच्या जप्त केलेल्या डायरीतही तिने महिंदर सर आणि शेरी मॅमने केलेल्या छळाविषयी नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्योती जांगरा प्रकरणाच्या २९ दिवसांनंतर, १६ ऑगस्ट रोजी शिवम कुमार डे याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवमने आत्महत्येसाठी स्वतःला जबाबदार धरले आहे. त्याने चिठ्ठीत देश महान बनायचा असेल तर योग्य शिक्षण व्यवस्था सुरू करावी लागेल, असे लिहिले आहे. मागील अनेक दिवस तो कोणत्याही लेक्चरला उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे शिवमचे वडील फी भरत होते. पण मुलगा हॉस्टेवर राहतो आणि लेक्चरला गैरहजर असतो, हे विद्यापीठ प्रशासनाकडून घरच्यांना सांगितले गेले नाही. आता शिवमने आत्महत्या केल्यानंतर ही माहिती त्याच्या घरच्यांना कळली आहे.

ज्योतीने प्राध्यापकांवर छळाचा आरोप केला, तर शिवमच्या कुटुंबातील सदस्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. शिवम सुमारे दीड वर्ष लेक्चरला जात नसताना त्याच्या कुटुंबाला याची माहिती का देण्यात आली नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कॅम्पस हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि देखरेखीच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिन्याभरापूर्वीच ज्योतीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर विद्यापीठ व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई का केली नाही ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Mumbai Housing Project : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणात्मक सुधारणा

सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर