पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार; ३०७ लोकांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता


इस्लामाबाद: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे आतापर्यंत ३०७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत. ही यंदाच्या मान्सूनमधील पाकिस्तानातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे.


पावसामुळे सर्वाधिक नुकसान वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात झाले आहे. येथील प्रादेशिक आपत्ती निवारण प्राधिकरणाने (PDMA) शनिवारी सकाळी ३०७ लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.


ढगफुटी, भूस्खलन आणि वीज कोसळणे यांसारख्या घटनांमुळे ही जीवितहानी झाली आहे. राजधानी इस्लामाबादपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या बुनर जिल्ह्याला या आपत्तींचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे १८४ जणांचा मृत्यू झाला आहे.


पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पाकिस्तानी लष्करही या कार्यात सहभागी झाले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. इतर भागांमध्येही नुकसान: खैबर पख्तुनख्वा व्यतिरिक्त इतर प्रांतांमध्येही मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती आहे. पाकिस्तानमधील या नैसर्गिक आपत्तीमुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.


Comments
Add Comment

योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

काठमांडू : भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये मागील ४-५ वर्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. आधी अफगाणिस्तान,

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

काठमांडू : आधी सोशल मीडिया बंदी विरोधात रस्त्यावर आलेल्या तरुणाईने नंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हिंसक

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा, दुबईला पळून जाण्याची शक्यता

काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी मागे, हिंसक आंदोलनानंतर सरकारचा निर्णय

काठमांडू: नेपाळ सरकारने देशात सुरू असलेल्या तीव्र आणि हिंसक आंदोलनानंतर अखेर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम

आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस

मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील