Anna Hazare on Pune Banner: पुण्यातील बॅनरबाजीवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी

पुणे: विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. या आरोपांनंतर देशातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना लक्ष्य करणारे बॅनर पुण्यातील पाषाणमधील रस्त्यावर लावण्यात आलं होतं.


ज्यात ९० वर्षीय अण्णा हजारेंविरुद्ध मजकूर छापत त्यांना तुम्ही गप्प का? असा सवाल करून, त्यांना टोमणा मारण्यात आला होता. ज्याबद्दल अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत आपले मत स्पष्ट केलं आहे..



बॅनरबद्दल काय म्हणाले अण्णा हजारे?


पुण्यात लावलेल्या बॅनरबद्दल नाराजी व्यक्त करताना अण्णा प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले "मी १० कायदे आणले. मात्र ९० वर्षानंतर देखील मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं, ही अपेक्षा चुकीची आहे. अण्णांनी जे केलं ते आपण करावं, असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे, देशाचे नागरिक आहेत तर, आपलं काही कर्तव्य आहे की नाही?"


अण्णा हजारे यांनी बॅनरबाजी करणाऱ्या लोकांचा समाचार घेताना म्हंटले, “भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आणि भ्रष्टाचारा आणले. माहितीचा अधिकार कायदा देशाला मिळाला. खूप मोठ्या प्रमाणात जागृती आली. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकआयुक्त असे १० वेगवेगळे कायदे आणले. मग ९० वर्षांचं झाल्यानंतरही मी काम करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर हे चुकीचं आहे”.



मी जे केलं ते आताच्या तरुणांनी करावं- अण्णा हजारे


“'काल स्वतंत्र दिवस साजरा केला. नुसता तिरंगा हातात घेऊन होणार नाही, बोट दाखवून काहीही होणार नाही. मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय, युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे, ही जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही', असे अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. "मागच्या काळात मी जे केलं ते आताच्या तरुणांनी आता करावं. युवकांनाही वाटलं पाहिजे की आपलं काही कर्तव्य आहे की नाही. मी देशाचा नागरिक आहे, या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांची देखील आठवण ठेवली पाहिजे. मात्र, नुसतं बोट दाखवायचं आणि हे करा ते करा. मात्र, यामधून काहीही होणार नाही. तरुणांनी जागं झालं पाहिजे. मी तरुणांकडे मोठ्या अपेक्षाने पाहत आहे.  मी हे कायदे आणले आणि तरुणांच्या हाती दिले. मग आज एवढ्या वर्षांनंतरही असा आवाज कानांवर येतो की अण्णा हजारेंनी जाग व्हावं, ही अपेक्षा चुकीची आहे”, असं अण्णा हजारे म्हणाले.


अण्णा हजारेंनी २०१२  मध्ये दिल्लीत (Delhi) मोठं आंदोलन उभारलं होतं. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर झालेल्या या आंदोलनात देशभरातून लोक सहभागी झाले होते आणि याच आंदोलनाचा फटका २०१४  मध्ये काँग्रेसला बसला. काँग्रेसची सत्ता जाण्यामध्ये कुठेतरी या आंदोलनाचा देखील वाटा होता.
Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे