Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी 'वन टू वन' चर्चा

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पाचारण केले असून, 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्या प्रत्येक आमदाराशी 'वन टू वन' चर्चा करणार आहेत. प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आमदारांची नेमकी मते काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होत असल्याचे समजते.


पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, सुनेत्रा पवार या आमदारांशी थेट संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भावना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली होती. पुसदचे आमदार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, "कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेतृत्वाने सल्लामसलत करणे गरजेचे आहे. हा निर्णय सामूहिक असावा आणि आम्ही आमची मते नेतृत्वाकडे स्पष्टपणे मांडू."


इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी तर विलीनीकरणाच्या बाजूने उघड भूमिका घेतली आहे. "पक्षातील ४० पैकी ३५ आमदार विलीनीकरणाच्या बाजूने आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल," असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र यासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे. "सध्या प्राधान्य हे सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करण्याला आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याला दिले जात आहे. विलीनीकरणाचा निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असेल, मात्र तो विषय अध्यक्ष निवडीनंतरच घेतला जाईल," असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.



शरद पवार गटाकडून सावध पावले


 

दुसरीकडे, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. "पक्षांतर्गत विलीनीकरणावर यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही आणि कोणताही नेता यावर जाहीरपणे बोलणार नाही," असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक

Devendra Fadnavis : पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "

Jalgaon : जळगावच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ? शहरातील चार ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपास प्रस्तावाला नितीन गडकरींचा हिरवा कंदील

Jalgaon : जळगावकरांसाठी वाहतुकीबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीवर

Sunetra Pawar : आदिवासी हा विकासाचा लाभार्थी नव्हे, तर विकासाला दिशा देणारा समाज!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; ग्लोबल वॉर्मिगबाबतचा जीवनमंत्र आदिवासींनी शेकडो वर्षांपूर्वी दिला मुंबई :