दहीहंडीला लागले गालबोट, आतापर्यंत झाले एवढे मृत्यू

मुंबई : दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे दहीहंडी उत्सवालाच गालबोट लागले आहे. मुंबईत दहीहंडी उत्साहात साजरी होत असताना एकाचा मृत्यू झाला. महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे दहीहंडीसाठी रश्शी बांधताना खाली पडून एकाचा मृत्यू झाला. जगमोहन शिवकिरन चौधरी (३२) असे मृताचे नाव आहे. दहीहंडी दरम्यान एकाचा मृत्यू झाला तर दुपारी तीन वाजेपर्यंत ३० जण जखमी झाले.

मुंबई शहर भागात १८ गोविंदा जखमी झाले. यापैकी १२ जणांवर उपचार सुरू आहेत आणि सहा जणांना उपचार करुन घरी पाठवले आहेत. मुंबई पूर्व उपनगर भागात ६ गोविंदा जखमी झाले. यापैकी ३ जणांवर उपचार सुरू आहेत तर तीन जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे. मुंबई पश्चिम उपनगर भागात ६ गोविंदा जखमी झाले. यापैकी एकावर उपचार सुरू आहेत आणि पाच जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी दरम्यान मुंबईत एकाचा मृत्यू झाला आणि दुपारी तीन वाजेपर्यंत ३० जण जखमी झाले. जखमींपैकी १६ जणांवर उपचार सुरू आहेत तर १४ जणांना उपचार करुन घरी पाठवले आहे.

ठाणे जिल्ह्यात आदित्य रघुनाथ वर्मा या गोविंदाला डोक्याला दुखापत झाल्यामुळे तर कृष्णा मिठू स्वयन याला उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केले आहे. समर बन्सीलाल राजभर यालाही डोक्याला दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल केले आहे.
Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील