कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई : दहीहंडीच्या निमित्ताने सर्वत्र ढाकूमाकूम... चा उत्साह दिसत आहे. या उत्साही वातावरणात दोन गोविंदा पथकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोकण नगर आणि जय जवान या दोन्ही जोगेश्वरीतल्या गोविंदा पथकांनी दहा थर लावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.



ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठी १० थर लावण्याची कामगिरी कोकण नगर गोविंदा पथकाने केली तर घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडीसाठी १० थर लावण्याची कामगिरी जय जवान गोविंदा पथकाने केली. दहा थर लावणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. यासाठी मानवी सामर्थ्याची कसोटी लागते.हे आव्हान कोकण नगर आणि जय जवान या दोन्ही गोविंदा पथकांनी पेलले. त्यांनी दहीहंडीसाठी १० थर लावून दाखवले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी आयोजकांकडून गोविंदा पथकांचा यथोचित गौरव करण्यात आला.



काही दिवसांपूर्वी प्रो गोविंदा स्पर्धा झाली. या स्पर्धेत विशिष्ट वेळेत वेगाने थर लावणे अपेक्षित आहे. यंदाच्या प्रो गोविंदा स्पर्धेत आर्यन्स गोविंदा पथक जिंकले. कोकण नगर या गोविंदा पथकाने स्पर्धेत १० थर लावण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी त्यांचे थर कोसळले. यामुळे त्यांनी बक्षिस गमावले होते. पण दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावण्याची किमया साधलीच. जय जवान गोविंदा पथकानेही दहीहंडीच्या दिवशी १० थर लावून सामर्थ्य दाखवून दिले.
Comments
Add Comment

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.