कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई : दहीहंडीच्या निमित्ताने सर्वत्र ढाकूमाकूम... चा उत्साह दिसत आहे. या उत्साही वातावरणात दोन गोविंदा पथकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोकण नगर आणि जय जवान या दोन्ही जोगेश्वरीतल्या गोविंदा पथकांनी दहा थर लावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.



ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठी १० थर लावण्याची कामगिरी कोकण नगर गोविंदा पथकाने केली तर घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडीसाठी १० थर लावण्याची कामगिरी जय जवान गोविंदा पथकाने केली. दहा थर लावणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. यासाठी मानवी सामर्थ्याची कसोटी लागते.हे आव्हान कोकण नगर आणि जय जवान या दोन्ही गोविंदा पथकांनी पेलले. त्यांनी दहीहंडीसाठी १० थर लावून दाखवले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी आयोजकांकडून गोविंदा पथकांचा यथोचित गौरव करण्यात आला.



काही दिवसांपूर्वी प्रो गोविंदा स्पर्धा झाली. या स्पर्धेत विशिष्ट वेळेत वेगाने थर लावणे अपेक्षित आहे. यंदाच्या प्रो गोविंदा स्पर्धेत आर्यन्स गोविंदा पथक जिंकले. कोकण नगर या गोविंदा पथकाने स्पर्धेत १० थर लावण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी त्यांचे थर कोसळले. यामुळे त्यांनी बक्षिस गमावले होते. पण दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावण्याची किमया साधलीच. जय जवान गोविंदा पथकानेही दहीहंडीच्या दिवशी १० थर लावून सामर्थ्य दाखवून दिले.
Comments
Add Comment

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील