कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

मुंबई : दहीहंडीच्या निमित्ताने सर्वत्र ढाकूमाकूम... चा उत्साह दिसत आहे. या उत्साही वातावरणात दोन गोविंदा पथकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोकण नगर आणि जय जवान या दोन्ही जोगेश्वरीतल्या गोविंदा पथकांनी दहा थर लावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.



ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठी १० थर लावण्याची कामगिरी कोकण नगर गोविंदा पथकाने केली तर घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडीसाठी १० थर लावण्याची कामगिरी जय जवान गोविंदा पथकाने केली. दहा थर लावणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. यासाठी मानवी सामर्थ्याची कसोटी लागते.हे आव्हान कोकण नगर आणि जय जवान या दोन्ही गोविंदा पथकांनी पेलले. त्यांनी दहीहंडीसाठी १० थर लावून दाखवले. या ऐतिहासिक कामगिरीसाठी आयोजकांकडून गोविंदा पथकांचा यथोचित गौरव करण्यात आला.



काही दिवसांपूर्वी प्रो गोविंदा स्पर्धा झाली. या स्पर्धेत विशिष्ट वेळेत वेगाने थर लावणे अपेक्षित आहे. यंदाच्या प्रो गोविंदा स्पर्धेत आर्यन्स गोविंदा पथक जिंकले. कोकण नगर या गोविंदा पथकाने स्पर्धेत १० थर लावण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी त्यांचे थर कोसळले. यामुळे त्यांनी बक्षिस गमावले होते. पण दहीहंडी उत्सवाच्या दिवशी कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावण्याची किमया साधलीच. जय जवान गोविंदा पथकानेही दहीहंडीच्या दिवशी १० थर लावून सामर्थ्य दाखवून दिले.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती