पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ काळ भाषण देण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी १०० मिनिटांहून अधिक काळ भाषण दिले आहे. याआधी त्यांचे सर्वात दीर्घ भाषण ९८ मिनिटांचे होते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लाल किल्ल्यावरून हे सर्वात मोठे भाषण दिले होते, आणि यंदा त्या विक्रमालाही मागे टाकले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजेच २०१५ मध्येच, लाल किल्ल्यावरून सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रम मोडला होता. त्या वेळी त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले होते आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ७२ मिनिटांच्या भाषणाचे जुने रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा स्वतःचे विक्रम मोडले आणि आता १०१ मिनिटांहून अधिक काळ भाषण देऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांनी लाल किल्ल्यावर सलग १२व्यांदा तिरंगा फडविला आहे. यापूर्वी हे फक्त जवाहरलाल नेहरू यांनीच केले होते. त्यांच्या नंतर इंदिरा गांधी यांच्या नावे सलग ११ वेळा तिरंगा फडविण्याचा विक्रम होता, जो यंदा पंतप्रधान मोदी यांनी मोडला आहे.
Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,