पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ काळ भाषण देण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी १०० मिनिटांहून अधिक काळ भाषण दिले आहे. याआधी त्यांचे सर्वात दीर्घ भाषण ९८ मिनिटांचे होते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लाल किल्ल्यावरून हे सर्वात मोठे भाषण दिले होते, आणि यंदा त्या विक्रमालाही मागे टाकले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजेच २०१५ मध्येच, लाल किल्ल्यावरून सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रम मोडला होता. त्या वेळी त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले होते आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ७२ मिनिटांच्या भाषणाचे जुने रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा स्वतःचे विक्रम मोडले आणि आता १०१ मिनिटांहून अधिक काळ भाषण देऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांनी लाल किल्ल्यावर सलग १२व्यांदा तिरंगा फडविला आहे. यापूर्वी हे फक्त जवाहरलाल नेहरू यांनीच केले होते. त्यांच्या नंतर इंदिरा गांधी यांच्या नावे सलग ११ वेळा तिरंगा फडविण्याचा विक्रम होता, जो यंदा पंतप्रधान मोदी यांनी मोडला आहे.
Comments
Add Comment

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने