पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम, नेहरू आणि इंदिरा गांधींना टाकले मागे

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ काळ भाषण देण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी १०० मिनिटांहून अधिक काळ भाषण दिले आहे. याआधी त्यांचे सर्वात दीर्घ भाषण ९८ मिनिटांचे होते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये लाल किल्ल्यावरून हे सर्वात मोठे भाषण दिले होते, आणि यंदा त्या विक्रमालाही मागे टाकले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात, म्हणजेच २०१५ मध्येच, लाल किल्ल्यावरून सर्वात लांब भाषण देण्याचा विक्रम मोडला होता. त्या वेळी त्यांनी ८८ मिनिटांचे भाषण दिले होते आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ७२ मिनिटांच्या भाषणाचे जुने रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा स्वतःचे विक्रम मोडले आणि आता १०१ मिनिटांहून अधिक काळ भाषण देऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांनी लाल किल्ल्यावर सलग १२व्यांदा तिरंगा फडविला आहे. यापूर्वी हे फक्त जवाहरलाल नेहरू यांनीच केले होते. त्यांच्या नंतर इंदिरा गांधी यांच्या नावे सलग ११ वेळा तिरंगा फडविण्याचा विक्रम होता, जो यंदा पंतप्रधान मोदी यांनी मोडला आहे.
Comments
Add Comment

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा