‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सैन्याच्या शौर्याची प्रशंसा


नवी दिल्ली : या वर्षी आपल्याला दहशतवादाचे दुःख सहन करावे लागले. पहलगाम हल्ला भ्याड आणि अमानवी होता. त्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आत्मनिर्भर भारत मिशनची चाचणी घेण्याची ही एक संधी होती. सैन्याने सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.


७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित केले. २४ मिनिटांच्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूर, काश्मीर रेल्वे प्रकल्प, विकास, लोकशाही आणि अर्थव्यवस्था यांसारख्या विषयांवर भाष्य केले.


राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, काश्मीर खोऱ्यात रेल्वे सेवा सुरू करणे ही एक मोठी कामगिरी आहे. यामुळे त्या भागात व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल. आयुष्मान योजनेचा ५५ कोटी लोकांना फायदा झाला आहे. भारत लोकशाहीची जननी आहे, संविधान आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपल्या संविधानात चार मूल्यांचा उल्लेख आहे, जे आपल्या लोकशाहीला मजबूत ठेवणारे चार आधारस्तंभ आहेत.


ही मूल्ये म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. या सर्व मूल्यांमध्ये व्यक्तीच्या प्रतिष्ठेची संकल्पना आहे. आपण आपल्या लोकशाहीवर आधारित संस्था निर्माण केल्या, ज्यामुळे लोकशाहीचे कामकाज बळकट झाले. आपले संविधान आणि लोकशाही आपल्यासाठी सर्वोपरी आहे. आपण फाळणीचे दुःख कधीही विसरू नये. आज आपण फाळणीचा भयानक स्मृतिदिन साजरा केला. फाळणीत भयानक हिंसाचार झाला आणि लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले. आज आपण इतिहासाच्या चुकांचे बळी ठरलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. भारताने ७८ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी भारताने बलिदानाच्या बळावर स्वातंत्र्य मिळवले असल्याचे त्या म्हणाल्या.


राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, स्वातंत्र्य परत मिळवल्यानंतर, आपण अशा मार्गावर निघालो जिथे सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार होता. दुसऱ्या शब्दांत, आपण स्वतःला आपले नशीब घडवण्याचा अधिकार दिला. अनेक लोकशाही व्यवस्थांमध्ये, लिंग, धर्म आणि इतर कारणांवरून लोकांना मतदान करण्यावर निर्बंध होते; परंतु आपण ते केले नाही. आव्हाने असूनही, भारतीयांनी लोकशाही यशस्वीरीत्या स्वीकारली. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या सामूहिक स्मृतीत कोरला गेला आहे.


१५ ऑगस्ट ही तारीख आपल्या सामूहिक स्मृतीत खोलवर कोरली गेली आहे. वसाहतवादी राजवटीच्या दीर्घ काळात, देशवासीयांच्या अनेक पिढ्यांनी स्वप्न पाहिले, की एक दिवस देश स्वतंत्र होईल. देशाच्या प्रत्येक भागात राहणारे लोक परकीय राजवटीच्या बेड्या तोडण्यासाठी उत्सुक होते.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी