दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ३ महिला आणि २ पुरुष आहेत. या सर्वांना मलब्यातून बाहेर काढून एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत अनेक लोक जखमी देखील झाले आहेत.


दिल्लीच्या निजामुद्दीन भागात हुमायूंच्या मकबऱ्यामागे असलेल्या पत्तेशाह दरगाहचे दोन खोल्या कोसळल्या. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या टीम्स उपस्थित आहेत. फायर ब्रिगेडने सांगितले की ५ ते ६ लोकांना आतापर्यंत मलब्यातून बाहेर काढून ट्रॉमा सेंटरला पाठवण्यात आले आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, ही घटना दुपारी ३:४५ वाजता घडली.


ही दुर्घटना हुमायूं टॉम्बच्या मागील परिसरात असलेल्या दरगाहमध्ये घडली. मलब्यात १०-१२ लोक अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. घटनेनंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून १२ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.


डीसीपी हेमंत तिवारी यांनी सांगितले, “आत्ताच काही निश्चित सांगता येणार नाही. काही लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अजून किती लोक आत अडकले आहेत हे शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.”


दिल्ली अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, संध्याकाळी साडेचार वाजता गुंबदाचा भाग कोसळल्याची माहिती मिळाली.यानंतर तात्काळ जवान घटनास्थळी रवाना करण्यात आले. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.


गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे, या जुन्या इमारतीची छत पावसामुळे कोसळली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की ८ ते ९ लोक अजूनही मलब्यात अडकले असण्याची शक्यता आहे, आणि दमकलच्या ५ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.


हुमायूं टॉम्ब हा १६व्या शतकात बांधलेला एक ऐतिहासिक स्मारक आहे, आणि पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या अपघातामुळे काही मृत्यू झाल्याची पुष्टी पोलीसांकडून करण्यात आली आहे, आणि परिस्थितीवर निरंतर लक्ष ठेवण्यात येत आहे.


Comments
Add Comment

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी