कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक रॅकेट्सचा पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन सायहॉक’ असे नाव असलेल्या या कारवाईत तब्बल ४,४६७ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून तांत्रिक पुरावे आणि विश्लेषणाच्या आधारावर ८७७ जणांना अटक करण्यात आली.


ही कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या समन्वयाने पार पडली. नवी दिल्ली परिसरात चालणारे सायबर फसवणूक रॅकेट्स, म्यूल अकाउंट्स, रोख रक्कम काढणारे एजंट आणि बेकायदा कॉल सेंटर्स यांच्यावर ही धडक मोहीम लक्ष्यित करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतरच्या प्रतिक्रियेऐवजी, गुन्हेगारीचे मूळ उद्ध्वस्त करण्यासाठी ही महत्वाची प्रक्रीया असल्याचे पोलिसांनी सांगितले.


या तपासणीदरम्यान १,००० कोटींहून अधिक रकमेचे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड झाले. हे व्यवहार दिल्लीतील संघटित सायबर सिंडिकेट्सकडून चालवल्या जाणाऱ्या म्यूल अकाउंट्समधून फिरवल्याचा संशय असल्याची माहिती संयुक्त पोलीस आयुक्त (इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) रजनीश गुप्ता यांनी दिली.


दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत ३६० नवीन गुन्हे दाखल झाले. नोकरीच्या आमिषाने फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, ग्राहकसेवा प्रतिनिधींचे खोटे रूप धारण करणे, टेक-सपोर्ट फसवणूक अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांत वापरली जाणारी अनेक बेकायदा कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. दरम्यान मोबाइल फोन, लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, सिम कार्डस्, आर्थिक नोंदी आणि डिजिटल पुरावे असे मोठ्या प्रमाणात साहित्य पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी