भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा केली आहे. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस २०१९, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड २०२०, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी २०२० आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड २०२० यांचा समावेश आहे. सध्या कामगारांसाठी अस्तित्वात असलेल्या २९ कायद्यांमधील सुधारणांच्या पार्श्वभूमीवर या संहितांमध्ये बदल करत नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे.



नवीन कामगार कायद्यांनुसार मिळणारा लाभ


 

- सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे



- युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल



- महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी



- ४० कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी



- निश्चित कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅच्युईटीची गॅरंटी


- ४० वर्षांवरील श्रमिकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची गॅरंटी


- ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची गॅरंटी


- जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना १०० टक्के आरोग्य सुरक्षेची गॅरंटी


- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी मिळेल


 

कामगारांचा विचार करून केलेले हे नवीन कायदे बदलाचा भाग नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांच्या कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. नव्या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून विकसित भारत २०४७चे ध्येय गाठण्यासाठी नवी गती देणार असल्याचे मनसूख मांडवीय यांनी सांगितले.



दरम्यान, भारतीय मजदूर संघाने एक परिपत्रक जारी करत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहुप्रतिक्षित चार कामगार संहिता लागू करण्याच्या भारत सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे भारतीय मजदूर संघ मनापासून स्वागत करतो. देशातील सर्व कामगारांसाठी प्रतिष्ठा, सुरक्षा आणि सुधारित कल्याण सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Comments
Add Comment

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात

Kanpur Shocker : कानपूरमध्ये SSC-GD परीक्षेचा बोजवारा! एकाच केंद्रावर क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची गर्दी; दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द

कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला.