Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, किन्नौर ढगफुटीने उध्वस्त; घरं-गाड्या पुरात गेल्या वाहून

किन्नौर : हिमाचल प्रदेशात निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखवला आहे. किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात झालेल्या ढगफुटीमुळे होजिस लुंगपा नाल्याला अचानक पूर आला. या पुरामुळे सतलज नदीच्या दुसऱ्या बाजूस चार जण अडकून पडले, तर एक व्यक्ती जखमी झाली. पुराचा जोर इतका प्रचंड होता की सीपीडब्ल्यूडीचा संपूर्ण कॅम्प वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच, ट्रिपिक्स ब्रिगेडची बचाव पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. रात्रीच्या अंधारात, पाण्याच्या प्रचंड प्रवाहाशी झुंज देत आणि कठीण डोंगरी मार्ग पार करत त्यांनी अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. लोकांना रात्रभर सुरक्षित ठेवण्यासाठी पथकाने विशेष हाय अल्टिट्यूड ड्रोन (LDHA) चा वापर करून अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. दरम्यान, जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढून रेकाँग पेओ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बचाव मोहिमेत दाखवलेली तत्परता आणि धैर्य, नैसर्गिक संकटांमध्ये मानवी जीव वाचवण्यासाठी किती महत्त्वाची असते, याचे उत्तम उदाहरण ठरली.



प्रशासन सतर्क


हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा कहर सुरू असून प्रशासन सतत सतर्क मोडवर आहे. किन्नौरमधील ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिमला, लाहौल आणि स्पिती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेक पूल प्रचंड पाण्याच्या लाटांमध्ये वाहून गेले आहेत, तर तब्बल ३०० हून अधिक रस्ते सध्या वाहतुकीसाठी बंद आहेत. गणवी खोऱ्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे एक पोलीस चौकी पूर्णपणे वाहून गेली, तर शिमला जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांचे दुकानं व मालमत्ता पाण्याखाली गेली आहे. सुदैवाने, आतापर्यंत या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तरीही, हवामान विभागाने आणखी पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन आणि स्थानिक बचाव पथके कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहिली आहेत.




 

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; ३२५ रस्ते ठप्प


हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे आणि ढगफुटीच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील मायाड खोऱ्यातील करपट भागात झालेल्या ढगफुटीनंतर चांगुट आणि उडगोस नाल्यांना अचानक पूर आला. या भीषण पाणलोटामुळे दोन पूल वाहून गेले, तर परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. पूर आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून अनेक एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. प्रशासन बचाव आणि मदत कार्यात पूर्ण क्षमतेने गुंतले आहे. राज्यभरातील या आपत्तीमुळे वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांसह तब्बल ३२५ रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरच्या (SEOC) आकडेवारीनुसार, यापैकी सर्वाधिक १७९ रस्ते मंडी जिल्ह्यात तर ७१ रस्ते शेजारच्या कुल्लू जिल्ह्यात बंद आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



ऑरेंज-यलो अलर्ट; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन


हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. गुरुवारी, राज्यातील कांगडा, मंडी, शिमला आणि सिरमौर या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोलन, उना, कुल्लू आणि चंबा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नद्या-नाल्यांच्या काठावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अत्यंत गरजेअभावी घराबाहेर पडू नये, असा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला आहे. हवामानातील या प्रतिकूल परिस्थितीमुळे पूर, भूस्खलन आणि रस्ते बंद होण्याच्या घटना घडू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या