वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती


विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ८ जिल्हा उपाध्यक्ष, ८ सचिव, ४ सरचिटणीस आणि एका कोषाध्यक्षाचा समावेश आहे. या कार्यकारणीत तत्कालीन पाच मंडळ अध्यक्षांना जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा सचिवपदाची पदोन्नती मिळाली आहे.


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, निरीक्षक आमदार विक्रांत पाटील, पालघर विभाग संघटन मंत्री हेमंत म्हात्रे,आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी सांगितले आहे. नव्या जिल्हा कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून राजेश म्हात्रे, दिलीप गायकवाड, जितेंद्र पाटील, गंगेश्वर श्रीवास्तव, सकीना नुरानी, कपिल म्हात्रे, देवराज सिंह आणि नारायण मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्हा सरचिटणीस पदी जोगेंद्रप्रसाद चौबे, मनोज बारोट,भूषण किनी आणि विजेंद्र कुमार तर जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून जितेंद्र मेहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, प्रवीण गावडे, हेमलता बाळशी, कुमारी मोहन, अश्विन सावरकर, कल्पेश नाईक आणि शशिकांत दुबे यांना जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपच्या विविध मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या नारायण मांजरेकर, नंदकुमार महाजन, रवी पुरोहित, देवराज सिंह आणि कपिल म्हात्रे या पाच मंडळ अध्यक्षांचा जिल्हा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या