तुमचे ICICI बँकमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची...


आयसीआयसीआय बँकेचा यूटर्न, बचत खात्यांसाठी किमान शिल्लक मर्यादा केली कमी


मुंबई: आयसीआयसीआय बँकेने नुकतीच नवीन बचत खात्यांसाठी जाहीर केलेली किमान मासिक सरासरी शिल्लक (MAB) रक्कम कमी केली आहे. ग्राहकांच्या प्रतिक्रियेनंतर, बँकेने मेट्रो आणि शहरी भागातील नवीन बचत खात्यांसाठीची मर्यादा ५०,००० रुपयांवरून १५,००० रुपयांपर्यंत खाली आणली आहे.



नवीन नियम काय आहेत?


मेट्रो आणि शहरी भाग: ५०,००० रुपयांवरून १५,००० रुपये.


निम-शहरी भाग: २५,००० रुपयांवरून ७,५०० रुपये.


ग्रामीण भाग: १०,००० रुपयांवरून २,५०० रुपये.



कोणासाठी लागू?


हे नवीन नियम १ ऑगस्ट २०२५ पासून उघडलेल्या नवीन खात्यांसाठी लागू आहेत. १ ऑगस्टपूर्वी उघडलेल्या खात्यांवर जुने नियमच लागू राहतील. तसेच सॅलरी खाते, वरिष्ठ नागरिक आणि पेन्शनर्सच्या खात्यांना हे नियम लागू नसतील.



दंड काय असेल?


जर एखाद्या खातेदाराने नवीन नियमानुसार आवश्यक असलेली किमान शिल्लक राखली नाही, तर त्याला कमी पडलेल्या रकमेच्या ६% किंवा ५०० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तो दंड आकारला जाईल.



इतर बँकांची स्थिती:


एकिकडे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक मोठ्या बँकांनी, जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), किमान शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द केला आहे. तर, HDFC आणि ॲक्सिस बँकेसारख्या काही इतर खासगी बँकांमध्येही आयसीआयसीआय बँकेच्या तुलनेत किमान शिल्लक मर्यादा कमी आहे.


Comments
Add Comment

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)