सीएम फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठे यश महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक होणार !

प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला आणखी एक यश प्राप्त झाले. महाराष्ट्र सरकारने कॅपिटललॅंड इन्व्हेसमेंट लिमिटेड (CLI) कंपनीशी यशस्वीपणे सामंजस्य करार (Memorandum of Understanding MoU) केला आहे. जागतिक दर्जाच्या या रिअल असेट मॅनेजमेंट कंपनीने महाराष्ट्रात या कराराअंतर्गत २०३० पर्यंत १९२०० कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याची घोषणा केली आहे. त्या कराराला अखेर मुहूर्त स्वरूप मिळाले. मुंबई पुणे या शहरात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. ही घोषणा नवी मुंबईतील एका कार्यक्रमात आज करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिंगापूरचे उपपंतप्रधान जान किम योंग, सीएलआयचे चेअरमन मनोहर खैतानी हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते. प्रसिद्धीपत्र काद्वारे सांगण्यात आल्याप्रमाणे कंपनीची २०१३ पासून उपस्थिती पुण्यातील हिंजेवाडी भागात आहे. इंटरनॅशनल टेक पार्क नावाने हा प्रकल्प सुरु झाला होता. त्यामुळे कंपनीने आपले पाऊल विस्तारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत या कंपनीने मुंबई पु ण्यात ६८०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात आणखी १९००० हजार कोटींची गुंतवणूक कंपनी करणार आहे. व्यवस्थापना अंतर्गत गुंतवणूकीत सध्याच्या ८ अब्ज डॉलरवरून वाढ करत १५ अब्ज डॉल रची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. ही वाढ २०२८ पर्यंत होणे अपेक्षित आहे असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले गेले आहे. ही गुंतवणूक औद्योगिक संकुल, लॉजिस्टिकस पायाउभारणी, डेटा सेंटर उभारणीसाठी होणार आहे. सीएलआयची पहिली पसंती महाराष्ट्रा ला देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक पोषक वातावरण पाहता आगामी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्च र पाहता कंपनीने गुंतवणूकीचा निर्णय घेतला आहे.

या गुंतवणूकीवर भाष्य करताना सीएलआय इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता म्हणाले की,'भारत हा CLI साठी एक प्रमुख बाजारपेठ आहे आणि महाराष्ट्र, त्याच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टी आणि सुविकसित आयटी आणि औद्योगिक परि संस्थेसह (Eco System) आमच्यासाठी आमचा ठसा वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देतो. गेल्या दशकात राज्य आमच्या विकास प्रवासात एक स्थिर भागीदार राहिले आहे आणि आम्हाला मिळालेल्या मजबूत पाठिंब्याची आणि सहकार्याची आम्ही कदर करतो. आम्ही आमच्या सूचीबद्ध ट्रस्ट, CLINT, आमचे खाजगी निधी आणि Ascendas-Firstspace प्लॅटफॉर्मद्वारे महाराष्ट्रात आमची गुंतवणूक वाढवत राहू. आम्ही आमची भागीदारी मजबूत करण्यास आणि महाराष्ट्राच्या व्यावसायिक आणि औद्योगिक विकासात आणखी योगदान देण्यास उत्सुक आहोत.'

तीन दशकांहून अधिक काळापासून भारतात असलेल्या उपस्थितीमुळे, सीएलआय (CLI) एकात्मिक रिअल अँसेट मॅनेजर, डेव्हलपर आणि ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी अद्वितीय स्थितीत आहे, जे उच्च-गुणवत्तेचे, शाश्वत प्रकल्प प्रदान (Sustainable) क रण्यासाठी मजबूत स्थानिक भागीदारीसह जागतिक कौशल्याचे संयोजन करते.
Comments
Add Comment

Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या

CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा

Pritam Chakraborty : प्रसिध्द संगीतकारचा 'त्या' पोस्टने चाहत्यांमध्ये खळबळ; निवृत्तीची चर्चा रंगली

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती (Music composer Pritam Chakraborty) यांनी १४ जून रोजी वाढदिवसानिमित्त सोशल

Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) शाळा ही केवळ शिक्षण

DCM Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबईत शुन्य जीवितहानी उद्दीत ठेवा मुंबई महापालिकेसह सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे दिले