चीनचे परराष्ट्र मंत्री पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर


नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन प्रशासनाद्वारे ५० टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यावर, चीन आणि भारताच्या संबंधांमध्ये अजूनही सौम्यता दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांची भेट घेण्यासाठी अलीकडेच भारतात येणार आहेत. ही भेट पुढील आठवड्यात होऊ शकते आणि या भेटीदरम्यान दोन्ही पक्ष अनेक महत्त्वाच्या बाबींवर विचारविनिमय करणार आहेत.


वांग यी आणि अजित डोभाल हे दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी आहेत, जे भारत-चीन सीमावादासंदर्भातील चर्चेचे नेतृत्व करतात. डोभाल आणि वांग यी यांच्यात भारतात होत असलेली ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा भारताचे चीन आणि रशिया यांच्याशी संबंध झपाट्याने बदलत आहेत. तर भारत आणि चीन यांनी अलीकडच्या काही महिन्यांमध्ये आपले द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.त्याचवेळी, टॅरिफबाबत भारताचे अमेरिका बरोबरचे संबंध बिघडले आहेत.गेल्या वर्षी, लडाखमधील तणावाच्या अंशतः समाधानासाठी दोन्ही देश एक करारावर पोहोचले होते.या वर्षाच्या सुरुवातीस, चीनने कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू केली, आणि भारताने देखील चीनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा देण्यास सुरुवात केली.


या महिन्याच्या अखेरीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या शिखर परिषदेसाठी चीनला जातील. या दौऱ्यात त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट होणार आहे.साल 2024 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी कझान येथे आयोजित 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. निरीक्षकांच्या मते, ही भेट दोन्ही देशांमधील संबंध स्थिर करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल होती.दोन्ही देश पुढील महिन्यापासून थेट प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू करणार आहेत.


कोविड-19 महामारीच्या काळात, 2020 पासून भारत-चीन दरम्यानची सर्व प्रवासी उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. एका अहवालानुसार, भारत आणि चीनमधील सुधारत चाललेल्या संबंधांचा आणखी एक संकेत म्हणजे, पुढील महिन्याच्या सुरुवातीस दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले आहेत. 31 जुलै रोजी त्यांनी 25 टक्के टॅरिफची घोषणा केली आणि त्यानंतर 6 ऑगस्टला भारताच्या रशियन तेल खरेदीवर आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचे जाहीर केले.ही संपूर्ण पार्श्वभूमी दर्शवते की भारत बहुपक्षीय आघाड्यांवर आपल्या परराष्ट्र धोरणात संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे चीनशी संवाद वाढवत असतानाच अमेरिका आणि रशियाशी संबंधित तणाव देखील हाताळत आहे.



Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला