Pankaja Munde: वैद्यनाथ बँक निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव

परळी वैजनाथ: राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे वैद्यनाथ अर्बन बँकेवर वर्चस्व कायम राहिले आहे.  पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे तेराही उमेदवार  मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला.


बीडसह राज्यभरात शाखा असलेल्या वैद्यनाथ बँक निवडणुकीचे मतमोजणी बीडच्या बाजार समितीत पार पडली. यामध्ये १७ पैकी ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर उर्वरित १३ जागांसाठी मतदान झाले होते. यातील विरोधी उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्याएवढेही मतदान मिळालेले नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांनी विरोधात उमेदवार उभे केल्याने ही निवडणूक झाली. परंतु मतदारांनी पंकजा मुंडे यांच्याच पॅनलवर विश्वास दाखवल्याचे दिसून आले.


संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या ३६ मतदान केंद्रावर शनिवारी मतदान पार पडले. एकूण ४३ हजार ९६२ मतदारसंख्येपैकी १६ हजार २८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, एकूण मतदानाची टक्केवारी ३७.५ इतकी नोंदवली गेली होती.


 

 

 
Comments
Add Comment

CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ

  Quick Breakfast Recipes : फक्त १५ मिनिटांत तयार होणारे ८ झटपट नाश्त्याचे पदार्थ

सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागलेली असते. (Easy & Quick Snack Recipes For Breakfast). यातच सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व

High Protein Fruits : कोणत्या फळात किती प्रोटीन? रोजच्या आहारात फळांचा समावेश कसा करावा?

रोजच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक जण "हाय-प्रोटीन फळे" शोधण्याचा प्रयत्न करतात. फळे ही

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त

Solo Trip : सोलो ट्रीपला जाण्याचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणांचा नक्की विचार करा

मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. सोलो ट्रिपमुळे (Solo Trip) नवीन ठिकाणं अनुभवता येतात,